
Tej Police Times
विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वगुणांना वाव मिळण्यासाठी ही स्पर्धा भरवली जाते. तरुणांना प्रभावित करणाऱ्या समाजातील विविध विषयांवर आवाज उठवण्यासाठी आणि त्यावर विचारांची देवाणघेवाण करता यावी यासाठी स्पर्धेच्या माध्यमातून कॉलेज विद्यार्थ्यांना व्यासपीठ दिले जाते. या व्यासपीठाच्या माध्यमातून प्रगतीशील कल्पनांचा मागोवा घेण्याची संधीही तरुणांना मिळते.
स्पीक फॉर इंडिया स्पर्धेमुळे मला स्पर्धा जिंकण्यापलीकडचा परिवर्तनीय असा प्रवास करता आला. त्याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे. जगातील आणि प्रादेशिक पातळीवरील गंभीर सामाजिक विषयांचे विश्लेषण करण्याची क्षमता यातून मिळाली आहे. तसेच योग्य दृष्टिकोन मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया मागील वर्षीचा विजेता पराग बदिर्के याने दिली.
मागील चार वर्षांच्या प्रवासात स्पीक फॉर इंडिया ही सर्वांत मोठी वादविवाद स्पर्धा होती. माझी मते मांडण्याची संधी मिळाल्याने क्षमतांचा विकास करता आला. हे शब्दांचे युद्ध आहे. त्यामुळे तुमची शस्त्रे धारदार करून या युद्धासाठी सज्ज व्हा, असे आवाहन मागील वर्षीचा उपविजेता करण पारिक याने केले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.