Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

इंडिया एक्झिम बँकेत ‘या’ पदांसाठी भरती, जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील

10

India Exim Bank Recruitment 2023: तुम्ही पदवीधर असाल आणि बँकेत नोकरीची संधी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. इंडिया एक्सीम बँक अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे व्यवस्थापक आणि व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी या पदांच्या एकूण १५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच बँकेने या भरतीबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

या पदांसाठी इच्छुक आणि आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून अर्ज प्रक्रिया १३ डिसेंबर २०२३ पासून सुरु होणार आहे. तर ०१ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा भरती मधील पदे, पात्रता अर्ज प्रक्रिया याचे सर्व तपशील घेऊया.

‘इंडिया एक्सीम बँक भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या :
व्यवस्थापक – ०३ जागा
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – १२ जागा
एकूण रिक्त पदसंख्या: १५ जागा

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून त्याचे तपशील अर्ज प्रक्रिया सुरू होण्याआधी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले. वेबसाइटची लिंक खाली जोडली गेली आहे.

नोकरी ठिकाण : मुंबई

GIC Recruitment 2023:’जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ मध्ये भरती, आजच करा अर्ज

वयोमर्यादा :
व्यवस्थापक – कमाल वय ३५ वर्षे
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – कमाल वय ३१ वर्षे
(राखीव प्रवर्गाला कमाल वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे)

अर्ज पद्धती : ऑनलाइन

निवड प्रक्रिया :
मुलाखतीद्वारे

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : १३ डिसेंबर २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०१ जानेवारी २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘इंडिया एक्झिम बँक’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया : या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच ०१ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.