Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’मध्ये दहावी पास उमेदवारांसाठी महाभरती; आजच करा अर्ज

7

Central Bank of India Recruitment 2024: तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल आणि बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत मोठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती द्वारे सफाई कर्मचारी सह उप कर्मचारी’ या पदांच्या एकूण ४८४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच सेंट्रल बँक ऑफ इंडियाने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आह.

या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून ०९ जानेवारी ही. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ही भरती प्रक्रिया परीक्षा आणि मुलाखतीद्वारे होईल. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या –
सफाई कर्मचारी सह सब स्टाफ – ४८४ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ४८४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – किमान १८ ते कमाल २६ वर्षे (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना ०५ वर्षे सूट आहे.)

वेतनश्रेणी – १४ हजार ५०० ते २८ हजार १४५ रुपये.

अर्ज शुल्क – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ८५० रुपये आणि अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/पीडब्ल्यूबीडी उमेदवार/ महिला उमेदवार यांच्यासाठी १७५ रुपये.

अर्ज पद्धती – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०९ जानेवारी २०२४

निवड प्रक्रिया – परीक्षा आणि मुलाखतीद्वारे

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती करिता थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच ०९ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.