
Tej Police Times
प्रेमाच्या आणाभाका घेत आयुष्यभर एकमेकांच्या सुखादुखात साथ देणारे दाम्पत्य म्हणजे रणविजय आणि गितांजली (नावे बदलेली आहेत). दोघांनीही ११ डिसेंबर २०१९ रोजी पुण्यातील विवाह निबंधक कार्यालयात लग्नगाठ बांधली. संसाराचा गाडा सुरळीत सुरू असताना वैचारिक मतभेदामुळे १४ सप्टेंबर २०२१ पासून वेगळे राहू लागले. नातेवाईक तसेच कुटुंबियांच्या मध्यस्थीनंतरही त्यांना एकत्र येण्यामध्ये उत्साह राहिला नाही. अखेर, गितांजली हिने घटस्फोट मिळावा यासाठी ९ डिसेंबर २०२२ रोजी न्यायालयात अर्ज केला. यादरम्यान, त्यांना समुपदेशानासाठी पाठविण्यात आले. समुपदेशानंतरही पतीनेही घटस्फोटाची तयारी दर्शविली.
स्टेजवर बसल्या बसल्या भोवळ अन् मग… सून आणायला गेले होते, मुलाचा मृतदेह घेऊन आले
त्यानंतर, गितांजलीने रणविजयकडून मिळणारा पोटगीचा हक्क सोडून देत त्याविरोधात दिवाणी अथवा फौजदारी दावा दाखल न करण्याचे मान्य केले.
एकमेकांच्या स्थावर व जंगम मिळकतीवर हक्क व अधिकार सांगणार नसल्याचे सांगत एकमेकांच्या आयुष्यात हस्तक्षेप न करण्याचे दोघांनीही कबूल केले. समुपदेशनानंतर पती-पत्नी घटस्फोटावर ठाम होते. यावेळी, पतीने पत्नीकडे असलेला आफ्रिकन पोपट करण्याची मागणी केली. त्यास पत्नीनेही संमती दिली.
पती पत्नीनं बनावट स्क्रीनशॉटद्वारे तब्बल ४०० जणांना घातला गंडा, सापळा रचून पोलिसांनी केली अटक
त्यानंतर विवाह समुपदेशक असलेल्या शशांक मराठे यांनी १६ नोव्हेंबर २०२३ पूर्वी पोपट पतीकडे सूपूर्द करण्यात यावा असे नमूद करत संबंधित अहवाल कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. कदम यांकडे पाठविला. घटस्फोटाच्या अर्जास सहा महिने पुर्ण झाले होते. दोघेही एक वर्षांपेक्षा जास्त काळ विभक्त राहत असल्याने न्यायालयानेही त्यांच्या घटस्फोटाच्या अर्जावर शिक्कामोर्तब केला.
दगडी फुटपाथ अन् मोठे स्लॅब; पाण्याखाली सापडलं ३७५ वर्ष जुनं रहस्यमय शहर, अखेर गूढ उकललं
Read Latest Maharashtra News And Marathi News
Recover your password.
A password will be e-mailed to you.