
Tej Police Times
नवीन वर्षाआधीच एलपीजी ग्राहकांना मोठी भेट! LPG सिलिंडरच्या दरात कपात, जाणून घ्या नवीन दर
मात्र, आज या निवडणुकीच्या एक वर्षानंतर गावातील अज्ञातांनी या लोकनियुक्त सरपंच संदीप पोळ यांच्या शेतात भानामती करून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. कोणीतरी अज्ञाताने खिळे, टाचण्या, लिंबू, नारळ, गुलाल, कुंकू अशा वस्तू टाकून भानामती आणि करणी केल्याचे गावकऱ्याच्या निदर्शनास आले. यानंतर सदर व्यक्तीने ही माहिती संदीप पोळ यांना दिली. यानंतर त्यांनी स्वतः शेतात जाऊन या सर्व वस्तू एकत्र करत शेतातून बाहेर आणल्या आणि आजूबाजूला जाणाऱ्या मुलांना बोलावून याबद्दलची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. शिवाय या सर्व वस्तूंची त्यांनी होळी केली. तर करणी, जादूटोणा आणि भानामती प्रकाराला आपण घाबरत नसून महाराष्ट्र शासनाने अशा प्रकारांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी २०१३ सालीच कायदा बनवला आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या या पुरोगामी नगरीत अशा गोष्टी आम्हाला मान्य नाहीत असे संदीप पोळ यांनी म्हटले आहेत.
संदीप पोळ हे उच्चशिक्षित असून ते विद्यापीठात राज्यशास्त्राचे धडे गिरवतात. त्यांनी राज्यशास्त्र या विषयात संशोधन देखील केले असून तळंदगे गावच्या सरपंच पदी निवडणूक लढवण्याच्या आधी ते पुण्यातील एका मोठ्या आयटी कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकरी करत होते. त्यांचे वडील देखील गावचे सेवा अधिकारी होते. यामुळे संदीप पोळ यांच्या रक्तातच समाजासाठी काही तरी करायचं हे भिनलेलं. यामुळे संदीप पोळ यांनी आयटीतील नोकरी सोडून राज्यशास्त्रात त्यांनी ‘एमए’ केलं. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. त्यांच्या या शिक्षणावर विश्वास ठेवत गावकऱ्यांनी त्यांना लोकनियुक्त सरपंच केलं आणि गेल्या वर्षभरात त्यांनी गावात अनेक विकास कामे देखील केली.
‘Rahul Review System’ केएलने शेवटच्या सेकंदाला घेतला चकित करणारा DRS; अंपायर पण झाले शॉक
Recover your password.
A password will be e-mailed to you.