
Tej Police Times
मंत्री मुनगंटीवार म्हणाले, नाट्य क्षेत्रातील दिशा सकारात्मक हवी, यासाठी १०० व्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने चिंतन आणि चर्चा व्हायला पाहिजे. प्रशांत दामले यांचे एकसारखे १२ हजार प्रयोग झाले, परंतु नाट्य पहायला येणार्यांची संख्या कमी होत आहे. परंतु जोपर्यंत दर्दी लोक आहेत, तोपर्यंत नाटकावर वाईट दिवस कधीच येवू शकत नाहीत. नाट्य या सर्वोत्कृष्ट कलेपुढे आव्हाने असून त्याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली. नाट्य कला जनतेच्या सिंहासनापर्यंत कायम चिकटवण्यासाठी राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग पूर्ण ताकदीने उभा राहिल.
राज्यात नव्याने ७५ नाट्यगृह उभारण्यास सरकारने मंजुरी दिली आहे, परंतु नाट्यगृहाचे भाडे परवडत असल्याच्या तक्रारी आहेत. नवी नाट्यगृहे सोलर यंत्रणेवर चालवून अल्प दरात उपलब्ध करुन दिली जातील. राज्यात ८६ नाट्यगृह आहेत. त्यापैकी ५२ स्थानिक स्वराज्य संस्थाकडे आहेत. या परिस्थितीत अवघी १२ नाट्यगृह सुसज्य आहेत. नाट्यगृहाची दयनिय अवस्था दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नगरविकास विभागही सरसावला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास ३५० वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त राज्यातील ३६ जिल्ह्यात जानता राजा हे नाटक दाखविण्याचे नियोजन केले असल्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.