
Tej Police Times
पणन महासंघाची संचालकपदासाठी ७ जानेवारीला निवडणूक होत आहे. निवडणूक झाल्यानंतर कापूस खरेदी प्रक्रियेला गती मिळेल. सर्वात प्रथम राज्यात किती केंद्र सुरू करायचे याचा निर्णय घेऊन त्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची व्यवस्था करावी लागणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना कापसाचा चुकारा देण्यासाठी बँकेकडून कर्ज घ्यावे लागणार आहे. राज्य शासनाने कर्जाची हमी घेणे आवश्यक आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर राज्यात पणन महासंघाचे केंद्र सुरू होईल.
शेतकऱ्यांकडे ८० टक्के कापूस
शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्याने पणन महासंघाला हमी दराने कापूस खरेदीची परवानगी मिळावी, अशी मागणी आम्ही अनेक वेळा केली. खरेदी केंद्र सुरू झाल्यावर शेतकऱ्यांना हमी दर मिळणार आहे. त्यामुळे बाजारात दर स्थिर राहतील. आजपर्यंत केवळ २० टक्के कापूस बाजारात आला आहे. ८० टक्के कापूस शेतकऱ्यांकडे आहे. त्यामुळे पणन महासंघाची केंद्र सुरू झाल्यावर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे माजी अध्यक्ष राजाभाऊ देशमुख म्हणाले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.