Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अजित पवारांचे सोमे आणि गोमे दिल्लीत आहेत. ज्यांनी गुलामी पत्करली आहे किंवा जे डरपोक आहेत त्यांनी आमच्यावर बोलूच नये. सोमे-गोमे कोण आहेत हे २०२४ला कळेल असे संजय राऊत म्हणाले. या महाराष्ट्रावर दिल्लीतून आक्रमण होतं असताना, महाराष्ट्राचे उद्योग पळविले जात असताना, रोजगार पळविला जात असताना सध्याच्या सरकारमधील हौशे-नवशे हे तोंडाला कुलुप लावून गप्प बसले आहेत त्यांना आमच्यावर बोलण्याचा अधिकार नाही असे राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नामर्द
महाराष्ट्रातील उद्योग पळविले जात असताना सत्ताधारी डोळ्यांवर कातडं आणि तोंडाला कुलुप लावून बसले आहेत. इतकं नामर्द सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या इतिहासात झालेले नाहीत. डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटला जातोय, मुंबई तोडली जात आहे तरी आम्ही तुरुंगात जाऊ या भयाने ते लटपटत आहेत अशी टीका संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.
महाराष्ट्र लुटण्यासाठी ठाकरे सरकार पाडलं
महाराष्ट्र लुटण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले असा आरोप राऊत यांनी केला. आमदार आणि खासदारांना फक्त महाराष्ट्राची लुट करण्यासाठी फोडण्यात आलं. पंतप्रधान हे सगळ्या देशाचे असतात. पण ज्याप्रकारे महाराष्ट्र आणि इतर राज्यांतून मोठं-मोठे प्रकल्प फक्त गुजरातला पळविले जात आहेत. याला विकास नाही तर दरोडा म्हणतात असे म्हणत राऊतांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.