
Tej Police Times
सर्वाधिक मृत्यूच्या यादीतले सहावे कारण
अजूनही म्हणजेच २०२३ मध्येही सर्वांत जास्त मृत्यू पावणाऱ्या भारतीय व्यक्तींच्या आजारांमध्ये क्षयरोग हा सहाव्या क्रमांकावर आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२५ पर्यंत क्षयमुक्तीची मोहीम यापूर्वीच जाहीर केली आहे. त्याचाच भाग म्हणून २०१५ मध्ये एक लाख लोकसंख्येमागे आढळून आलेल्या २१६ क्षयरुग्णांचे प्रमाण ४४ क्षयरुग्णांपर्यंत आणण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. त्याचवेळी मृत्यू दर एक लाख लोकसंख्येमागे ४४ पासून तीनपर्यंत खाली आणणे आणि रुग्णांच्या आजारांसाठी होणारा खर्च शून्यापर्यंत खाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. हे उद्दिष्ट गाठण्यात हातभार लागावा या हेतुने राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण, रौप्य व कास्य पदकांची स्पर्धा घेतली जात आहे आणि याचा निकाल क्षयरोगदिनी म्हणजेच २४ मार्च २०२४ रोजी जाहीर होणार आहे.
लाचखोरी काही थांबेना; राज्यात ७८६ सापळे, सर्वाधिक केसेस नाशिकमधील, काय सांगते २०२३मधील आकडेवारी?
रुग्णशोध मोहीम, उपचार व उपाय योजनांमुळेच क्षयरोगाचे प्रमाण ६० टक्क्यांपेक्षा जास्त कमी झाले आहे व सुवर्णपदकाच्या स्पर्धेसाठी एकमेव छत्रपती संभाजीनगर जिल्हा पात्र ठरला आहे. राज्याच्या क्षयरोग विभागाच्या प्रमुख डॉ. सुनिला गोल्हाईत, महापालिका प्रशासक जी. श्रीकांत, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. विकास मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांच्या प्रेरणेमुळेच जिल्हा राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.-डॉ. गणेश कल्याणकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी
Recover your password.
A password will be e-mailed to you.