
Tej Police Times
‘पनवती’ संबंध शनिदेवासोबत
वास्तविक ‘पनवती’ शब्द ज्योतिषशास्त्राशी संबंधित आहे. ज्योतिष शास्त्रात शनीच्या साडेसाती बद्दल तुम्ही ऐकलं असेलच. जेव्हा शनि जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या पुढील आणि मागील राशींवर होतो. शनि एका राशीत अडीच वर्षे राहतो, त्यामुळे जेव्हा एखाद्या व्यक्तीची साडेसाती सुरु होते तेव्हा साडेसात वर्षे त्या व्यक्तीला शनीची तीव्रता सहन करावी लागते. शनि संपूर्ण प्रदक्षिणा करायला अंदाजे ३० वर्षे घेतो. १२ राशींच्या या प्रवासाला ही ३० वर्षे लागतात. अर्थात प्रत्येक राशीला तो साधारणपणे अडीच वर्ष असतो, शनी ज्या राशीला असेल त्या राशीला तसेच तिच्या मागच्या व तिच्या पुढच्या राशीला अशा एकंदर तीन राशींना त्या त्या वेळी साडेसाती आहे असे मानतात. तीन राशीतील संक्रमणाला शनिला साडेसात वर्षांचा कालखंड लागत असल्याने शनिच्या या कालखंडाला ‘साडेसाती’ असे म्हटले जाते.
‘पनवती’ कशाला म्हणतात?
शनीची साडेसाती ‘पनवती’ म्हणून ओळखली जाते. कारण शनीची साडेसाती सुरू झाली की त्या व्यक्तीला विविध समस्येला सामोरे जावे लागते, अशी सर्वसामान्य समजूत आहे. पण आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगत आहोत ती म्हणजे ‘पनवती’ लहान आणि मोठी आहे असे मानले जाते. तसं पाहिलं तर साडेसाती म्हणजे आपल्या जीवनातील एक आव्हान आहे, ज्याला सोप्या भाषेत ‘पनवती’ म्हणतात.तर ढैय्या, जी व्यक्तीच्या जन्म राशीतून चौथ्या आणि आठव्या घरातील शनीच्या आगमनामुळे होते, त्याला छोटी‘पनवती’असे म्हणतात कारण ती फक्त अडीच वर्षे टिकते.
‘पनवती’ अशुभ आणि अमंगल नाही
शनिदेवाची साडेसाती म्हणजे ‘पनवती’ असे आपण समजतो पण नेहमीत साडेसाती अशुभ नसते. यासंर्दभात असे सांगतात की, शनि महाराजांनी भगवान शंभो शंकराची आराधना केली, प्रसन्न होऊन भगवान शंभोशंकराने शनिदेवाला नऊ ग्रहांमध्ये न्यायाधीशपद दिले. त्यामुळे जेव्हा शनीची दशा आणि संक्रमण होते तेव्हा शनिदेव त्या व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार शिक्षा देतात आणि बक्षीसही देतात. त्यामुळे शनीच्या साडेसातील अशुभ किंवा अमंगल म्हणणे योग्य नाही.
‘भद्रा’चा संबंध ‘पनवती’शी आहे
शनिदेवांसोबत शनीची बहीण भद्रा तिला सुद्धा‘पनवती’चे रुप आहे असे म्हणतात. हिंदू धर्मात भद्रकाळात कोणतेही शुभ कार्य करू नये अशी धारणा आहे. असे सांगतात की,
शनिदेवाची बहीण भद्रा जिथे जात होती तिथे सर्वनाश करत होती. त्यामुळे ब्रह्माजींनी भद्राला तिन्ही लोकांमध्ये स्थान दिले आणि तिचा काळही निश्चित केला. त्या बरोबरच भद्राच्या मुहूर्तावर, जेव्हा कोणतेही शुभ कार्य केले जाईल तर त्या कार्यात बाधा येते आणि त्या कार्याचे शुभ परिणाम नष्ट होतील असे सांगितले होते. त्यामुळे शनीची बहीण भद्रा तिला सुद्धा ‘पनवती’ असे म्हणतात.
नरेंद्र मोदींवर छोट्या ‘पनवती’चा प्रभाव
ज्योतिषशास्त्रानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वृश्चिक रास आहे.सध्या शनिदेव सिंह राशीतून चतुर्थ स्थानात प्रवेश करत आहेत. अशा स्थितीत वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनीची ढैय्या म्हणजेच छोटी ‘पनवती’सुरु आहे. म्हणूनच वृश्चिक राशीचे असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सध्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. याच कारणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोधकांकडून प्रखर टीकेचा सामना करावा लागतो आहे. तुम्हाला आठवत असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच निवडणूक जिंकली तेव्हा त्यांनी स्वतःला देशासाठी भाग्यवान म्हटले आणि आज त्यांनाच ‘पनवती’असे म्हटले जाते आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.