Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अचानक घरात घुसला, तरुणी घरी एकटीच, आधी विनयभंग, नंतर जीवे मारण्याची धमकी दिली अन्…

8

परभणी: घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देत एका २० वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्यात आला आहे. याप्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये आरोपीने वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचे देखील समोर आले आहे. हा सर्व प्रकार वैद्यकीय तपासणीनंतर समोर आल्यामुळे तपास करणारे पोलीस देखील चक्रावले आहेत. घटनेचा अधिक तपास दैठणा पोलीस करत आहेत. प्रदीप कच्छवे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
धावत्या स्कूल व्हॅनच्या चालकाला हार्ट अटॅक, मुलं घाबरली; भीतीपोटी रडू-ओरडू लागली, तितक्यात..
मिळालेल्या माहितीनुसार, २० वर्षीय तरुणी आपल्या लहान मुलासोबत घरामध्ये असताना गावातील प्रदीप कच्छवे हा तरुणी घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन घरामध्ये घुसला. त्यानंतर त्याने तरुणीसोबत झटापट करण्यास सुरुवात केली. मात्र तो आपल्याला वाईट उद्देशाने झटापट करत असल्याने तरुणीने याला विरोध केला. परिणामी संतापलेल्या प्रदीप कच्छवे यांनी घडलेला प्रकार कोणाला सांगितलास तर तुला जीवे मारून टाकतो, अशी धमकी तरुणीला दिली.

हा सर्व प्रकार घडल्यानंतर घाबरलेल्या तरुणीने याबाबतची माहिती आपल्या नातेवाईकांना दिल्यानंतर तरुणीने दैठणा पोलीस ठाणे गाटून आरोपी प्रदीप कच्छवे यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यावरून प्रदीप कच्छवे याच्यावर सुरुवातीला दैठणा पोलीस ठाण्यामध्ये विनयभंगाच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या प्रकरणाचा पोलीस तपास करत असताना पोलिसांना तपासा दरम्यान प्रदीप कच्छवे यांनी सदरील तरुणीवर अत्याचार केले असल्याचे देखील समजले.

टक्केवारीचं शेण कुणी खाल्लं? शिंदे गटातील मंत्री-खासदारांमध्ये शिवीगाळ, बैठकीतच भिडले!

त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी प्रदीप कच्छवे याच्यावर अत्याचाराचा गुन्हा देखील दाखल केला आहे. सदरील प्रकरणाच्या पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान मागील काही दिवसापासून राज्यांमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिवसेंदिवस महिलांच्या विनयभंगाच्या आणि अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. या सर्व प्रकरणांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने आणि राज्य शासनाने योग्य ती पावली उचलावी, अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.