
Tej Police Times
ठाकरे गटाच्या ‘त्या’ एका अडचणीमुळे काँग्रेसच्या आशा उंचावल्या, लोकसभा जागावाटपाबाबत महत्त्वाच्या हालचाली
रामदास आठवले यांनी म्हटले की, आगामी लोकसभेत महायुतीला राज्यात ४० पेक्षा जास्त जागा मिळतील तर देशात ४०० पेक्षा जागा मिळतील असा विश्वास रामदास आठवलेंना आहे. राज्यामध्ये आरपीआयला जागावाटपामध्ये दोन जागा मिळाव्यात अशी अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यासोबत मी २०२६ पर्यंत आहे राज्यसभेमध्ये आहे, यापूर्वी काँग्रेस अलायन्स मध्ये असताना एका वेळेला मुंबई आणि दोन वेळेला पंढरपूरमध्ये असं तीन वेळा मी लोकसभेला निवडून आलो होतो. शिर्डीमध्ये मी एकदा हरलो होतो, त्यामुळं पुन्हा शिर्डीमधून लढण्याची माझी इच्छा आहे. पक्षाने संधी दिली तर मी त्या ठिकाणाहून लढेल. अशी इच्छा रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
मोदी सरकारच्या ‘हॅटट्रिक’साठी भाजपचा मेगाप्लॅन, राज्यसभेतील दिग्गज नेते लोकसभा रिंगणात?
रामदास आठवले यांचा मंत्री पदाचा कार्यकाळ हा २०२६ पर्यंत आहे. तरीही रामदास आठवले यांनी २०२४ मध्ये लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पाहायला गेले तर शिर्डी लोकाभेची जागा सध्या शिंदे गटाकडे आहे. आगामी काळात ही शिंदे कडेच राहू शकते. मात्र असं असताना शिंदेना अडचणी वाढवण्यासाठी हा पेच असू शकतो का ? ज्या मावळ, शिरूर, आणि राज्यातल्या अन्य काही जागेंवर शिंदे यांच्या अडचणी वाढवण्यात येत असताना शिर्डीमध्ये सुद्धा असाच डाव मित्रा पक्षाचा असू शकतो का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळ होत आहे.
पदाचा मोह नाही, बाळासाहेबांचे विचार टिकवण्यासाठी सत्ता सोडण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
Recover your password.
A password will be e-mailed to you.