
Tej Police Times
जालना: गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवाहन केले असतानाच जालना येथे माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही नागरिकांना कळकळीची विनंती केली आहे. गणेशोत्सवाचे दहा दिवस आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमात राहूनच गणेशोत्सव साजरा करावा, असे टोपे म्हणाले. ( Rajesh Tope On Ganeshotsav 2021 )
वाचा: कल्पिता पिंपळे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली ही एकमेव विनंती!
राज्यात करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. त्याचवेळी काही भागांत रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावरच करोनाचं संकट पुन्हा गडद होऊ लागलं असताना राज्य सरकारकडूनही खबरदारी बाळगली जात आहे. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याबाबत सातत्याने सरकार आवाहन करत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही याबाबत काही बाबी स्पष्ट केल्या आहेत. ‘गर्दी न करता आणि अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला गेला पाहिजे. गणेशोत्सवाचे दहा दिवस आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागेल. उत्साह असू द्या पण गर्दी मात्र टाळा. जे निर्देश याबाबत सरकारने दिलेले आहेत किंवा देण्यात येतील त्याचे सर्वांनी पालन करायचे आहे,’ असं माझं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन आहे आणि नम्र विनंतीसुद्धा आहे, असे टोपे यांनी सांगितले. यावर्षी गणेश मंडळांची संख्या न वाढवता जुन्याच गणेश मंडळांनी गणेश मूर्ती पूजावी असे आवाहनही राजेश टोपे यांनी केले.
वाचा: नितीन गडकरींवरील ‘तो’ आरोप तथ्यहीन; उच्च न्यायालयापुढे युक्तिवाद
मराठा आंदोलकांना केले आश्वस्त
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात जे मराठा बांधव शहीद झाले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना आधीच्या सरकारने दिलेले आश्वासन महाविकास आघाडी सरकार पाळेल. त्यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी टोपे यांनी सांगितले. जालन्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षण आंदोलनात शहीद झालेल्या ४२ बांधवांच्या कुटुंबीयांना शासकीय नोकरी देण्याच्या मागणीसाठी अंबडमध्ये आंदोलन केले. मात्र या आंदोलना दरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जालन्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जोपर्यत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपचार घेणार नसल्याचे सांगत या आंदोलकांनी उपचार घेण्यास नकार दिला. अखेर टोपे यांनी आज या आंदोलकांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
अजित पवार यांनी दिला हा इशारा
गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध लावण्यात येणार नाहीत, मात्र नागरीकांनी गर्दी केली तर पहिल्या दिवसाचा अंदाज घेऊन दुसऱ्याच दिवशी कठोर निर्णय घेण्यात येईल, असे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. त्याला अनुसरूनच टोपे यांनी माध्यमांकडे प्रतिक्रिया दिली.
वाचा: हे काम माझे हितचिंतकच करताहेत!; वाढदिवशी खडसेंची फटकेबाजी
Recover your password.
A password will be e-mailed to you.