
Tej Police Times
खासदार राजन विचारेंच्या घरी आयकरचा छापा, अपात्रतेच्या तोंडावर ठाकरे गटाचे दोन शिलेदार कात्रीत
स्वच्छता अभियान सुरू केले केवळ मुंबई नाही तर अख्खा महाराष्ट्र स्वच्छ सुंदर करू आणि विकासाच्या आड येतील त्यांची सफाई आपल्या माध्यमातून होईलच असे सांगत खोट्याच्या कपाळी गोटा अशी एक म्हण आहे ती तुम्ही कोकणी माणसं येथे निवडणुकीत खरी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण या ठिकाणी विझलेल्या मशालींचा उजेड पडत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे असाही टोमणा मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटाला लगावला.
मुंबई ठाणे हे शिवसेनेचे शरीर जरी असलं तरी रत्नागिरी सिंधुदुर्ग ही शिवसेनेची दोन फुफ्फुस आहेत असे गौरव उद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची भूमिका बाळासाहेबांच्या विचार आपल्या निवडणूक पूर्व असलेला युती धर्म जनतेच्या भावना लक्षात घेत ज्यावेळेला निर्णय घेतला त्यावेळेला मला उदय सामंत,दीपक केसरकर यांनीही साथ दिली असा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. आम्ही घेतलेल्या निर्णय हा कोणत्याही सत्तेच्या मोहापाई लोभापाई खुर्चीसाठी घेतलेला नव्हता. शिवसेनेच, धनुष्यबाणाच खच्चीकरण होऊ लागलं महाराष्ट्राच्या विकासाच्या विरोधात भूमिका घेऊ लागले स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होऊ लागला बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली देऊ लागले आणि म्हणून मग आम्ही हा निर्णय घेतला असंही शिंदे आणि नमूद केलं. जनभावनेला मुरुड घालत जेव्हा अघटीत घडत होते त्या वेळेला आम्हाला निर्णय घ्यावा लागला. या कोकणाने कोकणी माणसाने शिवसेनेवर बाळासाहेबांवर जीवापाड प्रेम केलं. या कोकणी माणसाची नाळ ही बाळासाहेबांच्या विचारांशी जोडलेली आहे विचारांशी बांधिलकी आहे ती या धनुष्यबाणाबरोबर हा शिवसैनिक हिंदुत्ववादी विरोधी शक्तींचा आणि विघ्नसंतोषी लोकांचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही. यावेळी ना.दीपक केसरकर,ना.उदय सामंत यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं
Recover your password.
A password will be e-mailed to you.