
Tej Police Times
टोमॅटोचे भावही मर्यादेत आहेत व सध्या टोमॅटोची ३५ ते ४० रुपये किलोने किरकोळ विक्री होत आहे. अजूनही पालेभाज्या महागच आहेत व मेथी १५ रुपये जुडीने विकल्या जात आहे. पालक, कोथिंबीरही कधी १० रुपये तर कधी १५ रुपये जुडीने विकत घेण्याची वेळ येत आहे. वाहतुकदारांच्या संप काळात गायब झालेला वाटाणा आता बऱ्यापैकी उपलब्ध झाला असला तरी ५० ते ६० रुपये किलोच्या खाली नाही, हेही दिसून आले. त्या तुलनेत फळांचे दर काहीसे दिलासादायक असल्याचे पाहायला मिळत आहे.
DGP Maharashtra Rashmi Shukla | पहिल्या महिला पोलीस महासंचालक, रश्मी शुक्लांनी पदभार स्वीकारला
भाज्यांच्या तुलनेत फळांचे दर बरेच कमी आहेत. हिवाळ्यात पपई काहीशी महाग असते; परंतु मंगळवारी पपई शहागंजच्या बाजारात चक्क २० रुपये किलोने विकल्या गेली. फळबाजारात पेरुही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून, ३० ते ४० रुपये किलोने पेरुची विक्री होत आहे. अर्थात, सध्या पेरू अधिकतर पिकलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. त्याचबरोबर संत्रीही फळभाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत आणि पंजाब भागातून अधिकतर संत्री उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आले. हीच संत्री मंगळवारी ५० रुपये किलोने विकल्या गेली. सिताफळही ५० रुपये किलोने विकल्या गेले.
दौलताबाद परिसरातील अंजीर बाजारात ९० रुपये किलोने विकल्या जात आहेत. बाजारात काश्मीरचे डिलक्शन प्रकारचे सफरचंद आहेच; शिवाय बाहेर देशातील सफरचंदही विक्रीस उपलब्ध आहेत. देशी डिलक्शन ९० ते १०० रुपये किलो, तर बाहेर देशातील सफरचंदांची १२० रुपये किलोपासून विक्री होत आहे. मागच्या काही दिवसांपासून संकरित बोरांचीही मोठी आवक होत आहे आणि १५ ते २० रुपये पावशेप्रमाणे त्यांची किरकोळ विक्री सुरू आहे. पुन्हा अॅपल बोरांचीही काही प्रमाणात विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. शहागंजच्या बाजारात देशी स्ट्रॉबेरीचीही विक्री होत आहे. या स्ट्रॉबेरीची ४० रुपये पावशेरने, तर ७० रुपये किलोने विक्री होत आहे. अर्थात, आणखी चांगल्या प्रकारची स्ट्रॉबेरीदेखील बाजारात उपलब्ध आहे आणि अर्थातच त्यांचे दर जास्त आहेत.
Recover your password.
A password will be e-mailed to you.