
Tej Police Times
२०१८ साली पक्षाच्या घटनेतील बदलांची निवडणूक आयोगात नोंद का झाली नाही, असा सवाल पक्षातील एका गटाने उपस्थित केला आहे. या गटातील नेत्याने उद्धव ठाकरे यांच्याकडे आपले म्हणणे मांडले आहे. अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांच्यावर पक्षाच्या संघटनात्मक कामाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. घटनेतील बदल, संघटनात्मक रचना, निवडणूक आयोगाशी पत्र व्यवहार यामध्ये त्रुटी आढळल्याने विधिमंडळ अध्यक्षांनी विरोधात निकाल दिल्याची भावना पक्षातील एका गटाच्या मनात तयार झाली आहे.
घराणेशाही मोडीत निघाली, मग श्रीकांत शिंदे तुमचा मुलगा नाही सिद्ध करा, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर बोचरा वार
याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी संजय राऊत, अरविंद सावंत आणि सुभाष देसाई मातोश्रीवर दाखल झाले आहेत. सध्या मातोश्रीवर या अनुषंगाने खलबतं सुरु आहेत. जर निवडणूक आयोगात घटनेतील बदलांसह घटनेची प्रत सोपवण्यात आली असेल तर एंडोर्समेंट कॉपी घेऊन पत्रकार परिषद घ्यावी. पण पक्षाकडे एंडोर्समेंट कॉपी नसेल तर देसाईंना जाब विचारण्यात यावा, अशी मागणी या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आता मातोश्रीवरील बैठकीत काय निर्णय घेतला जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Recover your password.
A password will be e-mailed to you.