Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शशिकांत शिंदेंचा शिवेंद्रराजेंवर पलटवार; मतदारसंघात जाऊन दिलं आव्हान

16

हायलाइट्स:

  • साताऱ्यात पुन्हा राजकीय वातावरण तापलं
  • शशिकांत शिंदे याचा शिवेंद्रराजेंवर निशाणा
  • मतदारसंघात जाऊन दिलं आव्हान

सातारा : ‘मी फक्त निवडणुकीसाठी जावळी तालुक्यात येत नसतो, तर मी इथलाच असतो. या मातीशी माझी नाळ जोडलेली आहे. माझ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचं कार्यक्षेत्र आहे. आतापर्यंत जावळीत सर्व काही वातावरण चांगलं होतं म्हणून फारसं लक्ष देत नव्हतो. मात्र, यापुढे जावळी तालुक्यात यावं लागेल. मला कोणी घेरण्याचा प्रयत्न करू शकत नाही. कारण माझ्या पाठीशी शरद पवार यांचा आशीर्वाद आहे,’ असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर अप्रत्यक्षपणे पलटवार केला आहे.

जावळीत पिंपळबन बाल उद्यान लोकार्पण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना शशिकांत शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली.

…म्हणून जयंत पाटलांनी व्यक्त केली दिलगिरी

सर्जापूर येथे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांचं नाव न घेता निवडणुकीपुरते जावळीत येणाऱ्यांना भुलू नका, असा घणाघात केला होता. त्यालाच प्रतिउत्तर देताना शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “शशिकांत शिंदे हा नेहमीच संघर्ष करत आलेला लढवय्या आहे. माझा राजकीय प्रवासाचा उदय जावळीतूनच सुरू झाला असून, राजकारणात सगळेच पत्ते आताच ओपन करायचे नसतात. वेळ आल्यावर कोणता पत्ता कधी टाकायचा हे मला चांगलंच माहीत आहे. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. निवडणूक होईल किंवा नाही हे ज्या त्या वेळी ठरेल. मात्र, लढणे हे शशिकांत शिंदे याच्या रक्तात आहे. त्यामुळे लढाई कोणतीही असो मी मागे हटत नाही. काहीही झाले तरी माझी जावळीतून उमेदवारी नक्की आहे,’ असा ठाम विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, जावळी पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे, माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे आदी उपस्थित होते.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांत जावळीच्या आजी- माजी आमदारांमध्ये रंगलेल्या कलगी तुऱ्यामुळे जावळीतील राजकीय वातावरण काही प्रमाणात ढवळून निघालं आहे. त्याचे पडसाद उमटत असून दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.