
Tej Police Times
सर्वकाही सरकारकडे असताना सरकार आम्हालाच पुरावे मागते आहे. तलाठीसह सारथी, बार्टी, महाज्योती प्रवेशपूर्व परीक्षेतील गोंधळाचा उल्लेख करत परीक्षेच्या पारदर्शकतेवर विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केले. परीक्षा, अभ्यास सोडून विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच उतरायचे का, आंदोलनच करायचे का असा सवाल ही विद्यार्थ्यांनी केला. आमचे आई-वडिल शेतकरी आहेत. काबाडकष्ट करून आम्हाला शिकवता याची जाणिव आम्हाला आहे. परीक्षेत तुम्ही तुमचे कार्यकर्ते लावता. दहा, वीस लाख रुपये वसूल करता आणि मुलांना पास करून देता, आरोपही विद्यार्थ्यांनी केला. यावेळी प्रा. एच. एम. देसरडा, प्रा. विठ्ठल कांगने, कृती समितीचे प्रकाश उजगारे, राहुल मकासरे, सिद्धार्थ पाणबुडे आदींची उपस्थिती होती.
एसआयटी चौकशी करा
तलाठी परीक्षेतील गैरप्रकारांची एसआयटीमार्फेत चौकशी करण्याची मागणीही विद्यार्थ्यांनी यावेळी केली. तलाठी भरती रद्द करत भरती नव्याने घ्या, एक महिन्यात निकाल जाहीर करा. परीक्षेतील गैरप्रकारांची एसआयटी चौकशी करा अशी मागणी प्रा.विठ्ठल कांगने यांनी केली. ते पुढे म्हणाले, पेपर फुटला तलाठी भरतीचा. आम्ही आरोप केला तलाठी भरतीचा आणि उत्तर देत आहेत, गृहमंत्री. संबंधित खात्याचे मंत्री, अधिकाऱ्यांनी उत्तरे द्यायला हवेत असे विद्यार्थी म्हणाले. गृहमंत्री यांनी पोलिसभरती लवकर जाहीर करावी. पहिले लेखी का मैदान, वयोमर्यादाबाबतच्या प्रश्नावर त्यांनी लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले. प्रा. देसरडा यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अशा आहेत मागण्या..
तलाठी भरतीच्यावर एसआयटी चौकशी नेमण्यात यावी, टीसीएस, आयबीपीएस ऑनलाइन परीक्षा नकोच, इथून पुढचे सर्व पेपर्स एमपीएससीमार्फत घेण्यात यावे, परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे, परीक्षा अभ्यासक्रमावर आधारित घेण्यात यावी, भरती संदर्भात ज्या बातम्या आल्या त्याचा योग्य खुलासा करण्यात यावा. दरवर्षी भरती प्रक्रिया राबवावी.
Recover your password.
A password will be e-mailed to you.