
Tej Police Times
या सात गावात नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत नाही. पाणी पुरवठा बंद असल्याने सात गावातील हजारो नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ओढवली. या बिकट स्थितीत सरपंचा अर्पना रेचनकर, सदस्य अशोक रेचनकर यांनी सात गावांची तृष्णा भागविण्यासाठी धावून आलेत. वर्धा नदीच्या पात्रात योजनेची विहीर आहे. इथून योजनेत पाणी पुरवठा केला जातो. इथला विदयुत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
या विहिरीच्या काही अंतरावर रेचनकर यांच्या मालकीची दहा एकर शेती आहे. शेतात मिरची, वांगे, टमाटरचे पीक उभे आहे. रोज शेतीला पाणी करावे लागते. मात्र सात गावाची तहान भागविण्यासाठी रेचनकर यांनी शेतीच्या सिंचणासाठी असलेल्या विदयुत पुरवठा, योजनेचा मोटारपंपाकडे वळता केला. यामुळे शेतीला पाणीपुरवठा बंद झाला आहे. परिणामी शेतीला मोठा फटका बसला आहे. शेत कोरडे पडले आहे. पीकं करपत आहेत. गावासाठी शेतीचा बळी देणाऱ्या रेचनकर दापत्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.