
Tej Police Times
प्रतिवस्ती पाच किलो तांदूळ
याअंतर्गत वितरित करण्यात आलेल्या अक्षतांमध्ये ‘वाडा कोलम’ तांदळाचा समावेश होता. हा वाडा कोलम तांदूळ कोकणातून अयोध्येत रवाना करण्यात आला होता. मुंबई महानगर प्रदेशातील एकूण २४ हजार वस्त्यांसाठी प्रतिवस्ती पाच किलो अक्षतांचे वितरण करण्यात आले. या अक्षता ३० डिसेंबरलाच त्या-त्या वस्तीत पोहोचत्या करण्यात आल्या. त्यानंतर १ ते १५ जानेवारीदरम्यान घरोघरी हे संपर्क अभियान सुरू होते.
PMRDA विकास आराखड्याला अखेर मुहूर्त; मुख्यमंत्र्यांसमोर २४ जानेवारीला होणार सादरीकरण
दररोजचे माहिती संकलन
अभियानांतर्गत प्रत्येक घरी संपर्क व्हावा व प्रत्येक घरी अक्षता पोहोचत्या व्हाव्यात यासाठी यासाठी वस्ती प्रमुखांच्या समन्वयासाठी अभियान प्रमुखदेखील प्रत्येक वस्ती व प्रत्येक नगरात नियुक्त करण्यात आले होते. हे प्रमुख दररोज किती घरी संपर्क झाला, त्यात किती रामसेवक, सेविका, बालसेवक, बालसेविकांचा समावेश होता, याची आकडेवारी घेत होते. त्यानुसार लक्ष्यपूर्तीसाठी प्रयत्न करण्यात आले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.