
Tej Police Times
नवी मुंबई महापालिका देखील दिमतीला हजर होती. महापालिकेने पाण्याचे टँकर तसेच फिरते शौचालय सुविधा दिली होती. संध्याकाळी सात वाजल्यानंतर जरांगेंच्या ताफ्यातील ग्रामीन भागातून दाखल झालेली वाहनांनी नवी मुंबईकडे धाव घेतली. पनवेल ते वाशी असा येण्याचा मार्ग बदलून पामबीच मार्ग करण्यात आल्याने सर्वत्र गर्दी पहायला मिळाली. नवी मुंबईत मुख्यस्थळी ५ लाखांहून अधिक नागरिकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री उशिरा जरांगे यांचे नवी मुंबईत आगमन झाले.
मुंबईत येणाऱ्या मराठा बांधवांसाठी डबेवाला संघटना पुढे सरसावली
पनवेल शहर प्रवेशद्वार कळंबोली, कामोठे, बेलापूर, वाशी तुर्भे मार्केट परिसर येथे आंदोनला समर्थन देत जरांगे यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले होते. तर पाणी, जेवणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. अनेक ठिकाणी डिजे लावण्यात आले होते. लोणावळा येथे जरांगे पाटील आल्यानंतर त्यांना खोपोलीला येण्यासाठी तब्बल ८ ते ९ तास लागले. त्यांच्या समवेत ग्रामीण भागातील लहान मोठी वाहने घेऊन समाज बांधव होते. त्यामुळे खोपोली महामार्गावर २० ते २५ किमीच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
Recover your password.
A password will be e-mailed to you.