
Tej Police Times
गावच्या ग्रामदैवतचं कौल घेऊनचं डिसेंबरमध्ये नांगरणी सुरु होते. तब्बल पाचवेळा या मळ्यात नांगरणी केली जाते. पाचव्या आणि अंतिम नांगरणीच्यावेळी ग्रामदेवतेचा पुन्हा कौल मुहूर्त केला जातो. नांगरणी पूर्ण केल्यानंतर पुन्हा एकदा देवाचा कौल घेऊन लावणी सुरु केली जाते. कापणीच्यावेळी देखील देवाचीच आज्ञा घेतली जाते. देवाच्या परवानगीशिवाय या शेतातील पान ही हलविले जात नाही. म्हणूनच याला स्थानिक देवशेती म्हणतात. सर्वात महत्वाचे म्हणजे तीनशे पन्नास एकराचे हे भलेमोठे शेती क्षेत्र ओलीताखाली आणण्यासाठी पाण्याचे जे पाट तयार करण्यात आले आहेत. त्याचं तंत्रज्ञान आणि नियोजन हे आधुनिक तंत्रज्ञानालाही फिके पाडणारं आहे.
फटाके, डान्स, मिठाईचं वाटप; मराठा बांधवांनी विजयाचा गुलाल उधळला
या शेतीमधून जाणारा बारमाही पाण्याचा पाट ग्रामदेवतेने दिलेले वरदानच समजले जाते. गावराख्या देवस्थानाचा पहारा २४ तास देवमळ्यावर असल्यामुळे शेतीचे जनावरांपासून, पाखरांपासून वा नैसर्गिक आपत्तीपासून नुकसान होत नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ज्यावेळी हा गाव वसला त्या काळापासून शेती करतात. त्यामुळे या वांयगणी गावातील प्रत्येक कुटुंबाचा या देव शेतात एक तरी कोपरा आहे. त्यामुळे या गावातील प्रत्येक कुटुंब शेती करत आहे. त्यामुळे या शेतात प्रत्येक कुटुंबातील एक तरी माणूस या शेतामध्ये वावरत असताना दिसत आहे. रोप लावणीच्या वेळी शेतामध्ये जत्रेसारखं रूप पाहायला मिळतं.
या शेतामध्ये कोणताही तंटावाद न करता अगदी हसत खेळत या शेतामध्ये काम करताना दिसतात. या शेतामध्ये एक महिना जवळपास हिवाळ्यामध्ये थंडीच्या वातावरणात हे सर्व शेतकरी कुटुंब राबवत जमिनीची साफसफाई करत असतात. ही शेती करत असताना ग्रामदेवतेचा कौल घेऊनच त्याच्या अधिपत्याखालीच ही शेती केली जाते. आता बैल जोड्या उपलब्ध होत नसल्याने यांत्रिकीकरणाची कस धरली गेली. काही क्षणात होणाऱ्या नांगरणीमुळे रात्री नांगरणीसाठी होणारी धावपळ कमी झाल्याचे शेतकरी सांगतात. शेती परवडत नसल्याच्या भावनेतून काही ठिकाणी शेतकरी शेती करणे सोडत असल्याने पडीक क्षेत्रात वाढ होत आहे. मात्र क्रित्येक वर्ष पिढ्यांनपिढ्या देवाच्या साक्षीने वायंगणी येथे एकोप्याने केली जाणारी सुमारे तीनशे पन्नास एकरवरील भात शेती शेतकऱ्यांना नवउमेद देणारी ठरत आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.