Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

देवाच्या आज्ञेने शेकडो एकर शेती; ४०० वर्षाची परंपरा, ‘या’ देवशेतीची सर्वत्र चर्चा

6

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात अनेक रूढ़ी, प्रथा, परंपरा पहायला मिळतात. अनादी काळापासून चालत आलेल्या प्रथा आजही परंपरा जपल्या जातात. अशीच एक अनोखी प्रथा मालवण तालुक्यातील वायंगणी येथे पहायला मिळते. देवाच्या आज्ञेने शेकडो एकर शेती सामुदायिक रित्या केली जाते. फार पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा आजही त्याचं उत्साहात जतन केली जाते.

मिळालेल्या माहितीनुसार, मालवण तालुक्यातील वायंगणी गावातील सुमारे तीनशे पन्नास एकर क्षेत्रात पसरलेल्या या देवमळ्यातील ही देवशेती अन्यत्र कुठेही पाहता येणे शक्य नाही. पारंपारिक पद्धतीची शेती ४०० वर्षाची परंपरा असलेली सिंचन व्यवस्था, गावाचा एकोपा, एकसूत्रीपणा, सहकार, ग्रामदेवतेवरील श्रद्धा हे सर्व एकाच ठिकाणी या गावात देवाच्या मळ्यामध्ये अनुभवता येते. एकीकडे कोकणात दिवसेंदिवस पडीक शेत जमिनीचे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे याच कोकणातील वायंगणीसारखे गाव पिढ्यांपिढ्या शेतीसाठी एकत्र येतात.
दुष्काळामुळे मोसंबी बागेचे नुकसान; तरीही हिंम्मत हरला नाही, दीड एकरावर पेरुची लागवड, लाखोंची कमाई
या गावातील ही ऐतिहासिक परंपरा खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. शेकडो हातांची लगबग ही दृश्ये आणखी कुठेही पहायला मिळत नाही. वर्षातून एकदा या देवमळ्यात बळीराजाची ही अनोखी जत्रा चालते. या देवमळ्यात घेतलेल्या उत्पादनातून वर्षभर धान्य पुरलं जातं. अस इथले शेतकरी सांगतात. मात्र पावसाळ्यामध्ये या शेतामध्ये पाणी प्रचंड प्रमाणावर असल्यामुळे हे शेती पावसामध्ये करत नाही. तर उन्हाळी शेती केली जाते, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

गावच्या ग्रामदैवतचं कौल घेऊनचं डिसेंबरमध्ये नांगरणी सुरु होते. तब्बल पाचवेळा या मळ्यात नांगरणी केली जाते. पाचव्या आणि अंतिम नांगरणीच्यावेळी ग्रामदेवतेचा पुन्हा कौल मुहूर्त केला जातो. नांगरणी पूर्ण केल्यानंतर पुन्हा एकदा देवाचा कौल घेऊन लावणी सुरु केली जाते. कापणीच्यावेळी देखील देवाचीच आज्ञा घेतली जाते. देवाच्या परवानगीशिवाय या शेतातील पान ही हलविले जात नाही. म्हणूनच याला स्थानिक देवशेती म्हणतात. सर्वात महत्वाचे म्हणजे तीनशे पन्नास एकराचे हे भलेमोठे शेती क्षेत्र ओलीताखाली आणण्यासाठी पाण्याचे जे पाट तयार करण्यात आले आहेत. त्याचं तंत्रज्ञान आणि नियोजन हे आधुनिक तंत्रज्ञानालाही फिके पाडणारं आहे.

फटाके, डान्स, मिठाईचं वाटप; मराठा बांधवांनी विजयाचा गुलाल उधळला

या शेतीमधून जाणारा बारमाही पाण्याचा पाट ग्रामदेवतेने दिलेले वरदानच समजले जाते. गावराख्या देवस्थानाचा पहारा २४ तास देवमळ्यावर असल्यामुळे शेतीचे जनावरांपासून, पाखरांपासून वा नैसर्गिक आपत्तीपासून नुकसान होत नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ज्यावेळी हा गाव वसला त्या काळापासून शेती करतात. त्यामुळे या वांयगणी गावातील प्रत्येक कुटुंबाचा या देव शेतात एक तरी कोपरा आहे. त्यामुळे या गावातील प्रत्येक कुटुंब शेती करत आहे. त्यामुळे या शेतात प्रत्येक कुटुंबातील एक तरी माणूस या शेतामध्ये वावरत असताना दिसत आहे. रोप लावणीच्या वेळी शेतामध्ये जत्रेसारखं रूप पाहायला मिळतं.

या शेतामध्ये कोणताही तंटावाद न करता अगदी हसत खेळत या शेतामध्ये काम करताना दिसतात. या शेतामध्ये एक महिना जवळपास हिवाळ्यामध्ये थंडीच्या वातावरणात हे सर्व शेतकरी कुटुंब राबवत जमिनीची साफसफाई करत असतात. ही शेती करत असताना ग्रामदेवतेचा कौल घेऊनच त्याच्या अधिपत्याखालीच ही शेती केली जाते. आता बैल जोड्या उपलब्ध होत नसल्याने यांत्रिकीकरणाची कस धरली गेली. काही क्षणात होणाऱ्या नांगरणीमुळे रात्री नांगरणीसाठी होणारी धावपळ कमी झाल्याचे शेतकरी सांगतात. शेती परवडत नसल्याच्या भावनेतून काही ठिकाणी शेतकरी शेती करणे सोडत असल्याने पडीक क्षेत्रात वाढ होत आहे. मात्र क्रित्येक वर्ष पिढ्यांनपिढ्या देवाच्या साक्षीने वायंगणी येथे एकोप्याने केली जाणारी सुमारे तीनशे पन्नास एकरवरील भात शेती शेतकऱ्यांना नवउमेद देणारी ठरत आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.