
Tej Police Times
मनोज जरांगे हे मराठा समाजाचा आवाज बनले. नाशिकमध्ये नाना बच्छाव यांनी १०५ दिवस उपोषण केले. मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी जरांगे यांच्या नेतृत्वात मुंबई गाठण्यात आली. अध्यादेशाद्वारे महत्वाच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. आजचा दिवस क्रांतिकारी असून, आम्ही हा लढा जिंकला आहे.- राम खुर्दळ, प्रवक्ता, सकल मराठा समाज
आज समस्त मराठा समाजाचा विजय झाला आहे. मराठा क्रांतिसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील, अण्णासाहेब येरळीकर, प्रा. देवीदास वडजे, कै. आमदार विनायक मेटे यांसह शेकडो समाजबांधवांनी मराठा आरक्षणासाठी जे बलिदान दिले, त्याचे हे यश आहे. मनोज जरांगे यांच्या प्रामाणिक संघर्षामुळे हे शक्य झाले आहे.- करण गायकर, छावा क्रांतिवीर संघटना
Recover your password.
A password will be e-mailed to you.