तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

राज्यात नव्या करोनाबाधितांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त; जाणून घ्या ताजी आकडेवारी

0 55

हायलाइट्स:

  • नव्या करोना रुग्णांची संख्या ४ हजारांच्या आसपास स्थिरावली
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ टक्के
  • सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून नव्या करोना रुग्णांची संख्या ४ हजारांच्या आसपास स्थिरावली आहे. राज्यात आज ४ हजार १५४ नवीन रुग्णांचं निदान झालं, तर ४ रुग्ण ५२४ रुग्ण (Maharashtra Corona Cases Today) बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यात आजपर्यंत एकूण ६२,९९,७६० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.०५ टक्के एवढं झालं आहे. मात्र राज्यात आज ४४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगून लुटणाऱ्या मनोहर भोसलेला साताऱ्यातून अटक

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,५७,०२,६२८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,९१,१७९ (११.६५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,९६,५७९ व्यक्ती होम क्वारन्टाइनमध्ये आहेत, तर १,९५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारन्टाइनमध्ये आहेत.

अण्णा हजारे समर्थकांकडून नगरमध्ये नव्या आंदोलनाची घोषणा

दरम्यान, राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांतील करोना प्रादुर्भाव सध्या आटोक्यात दिसत असला तरीही सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर करोना नियमांचं उल्लंघन झाल्यास पुन्हा एकदा रुग्णवाढीचा धोका आहे. त्यामुळे अनेक भागात प्रशासनाने जमावबंदीसारखा कठोर निर्णय घेतला आहे. नागरिकांकडून करोना नियमांबाबत शासन-प्रशासनाने केलेल्या आवाहनाला कसा प्रतिसाद दिला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.