
Tej Police Times
भाजप-शिवसेना सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर तो प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना स्वतःहून कळविल्याचे अनिल पाटील यांनी फेरसाक्षीदरम्यान सांगितले. पक्षात प्रवेश घेतल्यापासून आपल्याला शरद पवार यांच्याविषयी पक्षातील अनेकांच्या मनात असंतोष असल्याचे जाणवले, तसेच आपल्याही मनात हळुहळू निर्माण होऊ लागला, असे वक्तव्य या वेळी पाटील यांनी केले. असंतोष असूनही मग पक्षात का काम करीत होता, असे वकिलांनी विचारल्यावर, पक्षात काम करण्याची इच्छा असल्याने आपण काहीही बोललो नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
….तर महाराष्ट्राचे चित्र बदलू शकतो, शरद पवार यांनी व्यक्त केला विश्वास
पाटील यांनी फेरसाक्षीदरम्यान, पक्षात मनमानी कारभार सुरू असे, तसेच कोणत्याही निवडणुका होत नसे, तर शरद पवार यांच्याकडूनच नेमणुका होत असल्याचे सांगितले. त्यांच्याशी काही ठराविक नेतेच बोलत, असा दावा पाटील यांनी केला. पवार यांनी राजीनामा देण्याचे जाहीर केल्यानंतरही अनेकांच्या मनात त्यांनी तो परत घेऊ नये, असे होते; परंतु जनतेसमोर पक्षाची प्रतिमा खराब होऊ नये, यासाठी माझ्यासह अनेकांनी राजीनामा मागे घेण्यासाठी जाहीर वक्तव्ये केल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
म. टा. प्रतिनिधी यांच्याविषयी
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Recover your password.
A password will be e-mailed to you.