Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अंबरनाथमध्ये कार आणि रिक्षाचा भीषण अपघात: ४ जण ठार; रिक्षाचा चक्काचूर

15

हायलाइट्स:

  • कार आणि रिक्षाची धडक झाल्याने भीषण अपघात
  • अपघातात चार जणांचा मृत्यू
  • घटनेनं परिसरात हळहळ

अंबरनाथ : शहरातील पालेगाव भागातील नवीन एमआयडीसी इथे कार आणि रिक्षाची धडक झाल्याने भीषण अपघात झाला. सायंकाळच्या सुमारास झालेल्या या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.

हा अपघात इतका भीषण होता की कारच्या धडकेनंतर रिक्षाचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीस अपघातस्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आले.

गुन्हे शाखेची मोठी कारवाई; तब्बल १ कोटी १० लाख रुपयांचा गांजा जप्त

वर्षा वलेचा (वय ५१), आरती वलेचा (वय ४१), राज वेलेचा (वय १२) आणि रिक्षा चालक किशन विठ्ठल शिंदे अशी या अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत.

दरम्यान, या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अपघातात ४ जणांना आपला जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.