तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

Shivrayancha Chhava: सहा दिवसांत सिनेमाची कोट्यवधींची कमाई,लवकरच पार करणार बजेटचा आकडा

0 69

मुंबई: छत्रपती संभाजी महाराज हे असं वादळ होतं, ज्यांच्या तलवारीच्या पराक्रमानं दाही दिशा उजळून गेल्या. रणांगण गाजवणाऱ्या या हिंदवी स्वराज्याच्या वाघाचा पराक्रमी इतिहास उलगडणारा, दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये सिनेमाबद्दल उत्सुकता होती. सिनेमात छत्रपती संभाजी राजेंची भूमिका कोण साकारणार?याबद्दल सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. अभिनेता भूषण पाटील या सिनेमात छत्रपती संभाजी राजेंची भूमिका साकारताना दिसत आहे. प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं.

डाऊन पेमेंट, हफ्त्यांसाठीची काटकसर…मुंबईतल्या घरासाठी केतकीनं अशी केली पैशांची जुळवाजुळव

प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या तीन दिवसांत सिनेमानं चांगली कमाई केली होती. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या दिवशी कमाईचे आकडे कमी झाल्याचं पाहायला मिळालं. sacnilk या वेबसाइटच्या आकड्यांनुसार सिनेमानं आतापर्यंत ४.३९ कोटींच्या आसपास कमाई केली आहे. खरं तर बॉलिवूड सिनेमांचा परिणाम या सिनेमाच्या कमाईवर झाल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत सिनेमा चांगली कामगिरी कर शकतो, असंही म्हटलं जात आहे.

दिग्पाल लांजेकरांनी सांगितलं छत्रपतींसाठी कशी बदलली प्रेक्षकांची मानसिकता


बजेट किती?

शिवरायंचा छावा सिनेमाचं बजेट हे ८ कोटींच्या जवळपास असल्याचं म्हटलं जात आहे.

छत्रपती संभाजी महाराजांचं अतुलनीय शौर्य, हुशारी आणि धाडस या गुणांचं दर्शन ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटात पाहायला मिळत आहे. मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, भूषण पाटील, रवी काळे, समीर धर्माधिकारी, राहुल देव, विक्रम गायकवाड, भूषण शिवतरे, अमित देशमुख, तृप्ती तोरडमल, ईशा केसकर, प्रसन्न केतकर, अभिजीत श्वेतचंद्र, ज्ञानेश वाडेकर, आशुतोष वाडेकर, बिपीन सुर्वे आदी कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत.

आडनाव हटवल्यानं दिव्या खोसला आणि भूषण कुमार यांच्या घटस्फोटांच्या चर्चा, पण खरं कारण वेगळंच
मल्हार पिक्चर्स कं.चे वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी ‘शिवरायांचा छावा’ या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. सह-निर्मिती भावेश रजनीकांत पंचमतीया यांनी केली असून कार्यकारी निर्माता प्रखर मोदी आहेत. कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून, पटकथा-संवाद आणि गाणीदेखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी ए. ए. फिल्म्स सांभाळत आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.