Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

फुकट ५जीची वसुली सुरु होणार? सर्वप्रथम एअरटेल करणार भाववाढीचा वार

8

भारतातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी लवकरच आपल्या टॅरिफ प्लॅन्समध्ये दरवाढ करू शकते. एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल यांनी एका मुलाखतीत सांगितले की कंपनी भारतात आपले टेलिकॉम दर वाढवणार आहे, जेणेकरून बाजारात टिकणे सोपं होईल. मित्तल यांनी दरवाढी कधी होईल हे मात्र सांगितलं नाही. परंतु हा बदल २०२४ च्या उत्तरार्धात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एअरटेलला आगामी काही महिन्यांमध्ये आपला २०८ रुपयांवर असलेला अ‍ॅव्हरेज रेव्हेन्यू पर युजर (ARPU) ३०० रुपये करायचा आहे. एअरटेल भारतात सतत आपल्या ५जी सर्व्हिसचा विस्तार करत आहे, कंपनी स्पेक्ट्रम आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडसाठी बराच खर्च करत आहे. आणि त्यामुळे हा खर्च भरून काढण्याचे मार्ग कंपनी शोधत आहे.
हे देखील वाचा: एअरटेलने लाँच केले ‘रिसायकल प्लास्टिक सिम कार्ड’; कार्बन उत्सर्जन कमी करण्यात पुढाकार

एक बाब लक्षात असू की डिसेंबर २०२१ पासून भारतीय टेलिकॉम सेक्टरमध्ये जास्त दरवाढ झालेली नाही आहे. जेव्हपासून देशात ४जी आलं आहे तेव्हापासून नेटवर्क प्रोव्हायडर्सनी दर २-३ वर्षांनी टॅरिफ रेट्स वाढवण्याची प्रथा सुरु केली आहे.

Jio आणि Vi देखील जाऊ शकतात Airtel च्या मार्गावर

सध्या भारतीय टेलिकॉम सेक्टरमध्ये जिओ, एअरटेल आणि वी या तीन प्रमुख कंपन्या आहेत. जरी BSNL बाजारात असली तरी तिचा बाजारावर इतका प्रभाव पडत नाही. त्यामुळे जर एअरटेलनं भाववाढ केली तर जिओ आणि वी देखील आपले रेट्स वाढवू शकतात. याआधी देखील असंच काहीसं घडलं होतं. नोव्हेंबर २०२१ मध्ये एअरटेलनं आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्सचे दर २० टक्क्यांनी वाढवले होते. त्यानंतर महिनाभरात जिओ आणि वी देखील दरवाढ केली होती.

अलीकडेच आलेल्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते की एअरटेल आणि जिओ लवकरच आपलं अनलिमिटेड ५जी चं ट्रायल बंद करू शकतात. तसेच दोन्ही कंपन्या आपले ५जी रिचार्ज प्लॅन्स सादर करू शकतात, ज्यांची किंमत ४जी प्लॅन्स पेक्षा ५ ते १० टक्के जास्त असू शकते. या रिपोर्टमध्ये असं देखील सांगण्यात आले होते की ४जी पॅकच्या किंमती देखील वाढवल्या जातील. आता मित्तल यांच्या वक्तव्यामुळे हा रिपोर्ट लवकरच खरा ठरेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.