
Tej Police Times

‘गेल्या काही वर्षांपासून भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष केंद्रात आणि बहुतांश राज्यांमध्ये सत्तेत आहेत. या काळात अनेक ठिकाणी जातीयवादी, भांडवलशाही, संकुचित धोरणे आणि कार्यशैलीमुळे त्यांना पोषक वातावरण नाही. यामुळे यंदाच्या निवडणुका निष्पक्ष झाल्यास भाजपला पुन्हा सत्तेवर येणे सोपे जाणार नाही. या निवडणुकीत त्यांची नाटके चालणार नाहीत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना, सर्वसामान्यांना यापूर्वी दिलेली कोणतीही आश्वासने पूर्ण झालेली नाहीत. यामुळे देशातील जनता सजग झाली असून, याचा त्यांना फटका बसेल,’ असे मायावती म्हणाल्या.
‘बसप कोणाशीही युती न करता स्वबळावर निवडणूक लढवत आहे. पक्षाने तिकीट वाटपाबाबत समाजातील सर्व घटकांना समान न्याय दिला आहे,’ असे सांगतानाच काँग्रेसप्रमाणेच भाजप सरकारमध्येही बहुतांश तपास यंत्रणांचा राजकारणासाठी वापर केला असल्याचे त्या म्हणाल्या.
नवनीत राणांना चोर म्हणाल्या, अमरावतीतून यशोमती ठाकूर कडाडल्या
पहिल्या टप्प्यात येथे मतदान
उत्तर प्रदेशातील सहारणपूर, कैराना, मुझफ्फरनगर, बिजनौर, नगीना (राखीव), मुरादाबाद, रामपूर आणि पिलीभीत या आठ लोकसभा मतदारसंघांत पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
काँग्रेसवरही हल्लाबोल
काँग्रेसवर हल्लाबोल करताना मायावती म्हणाल्या, ‘काँग्रेसचा ‘गरिबी हटाओ’चा नारा योग्य हेतू आणि धोरणाअभावी केवळ निवडणूक घोषणेपुरता राहिला आहे. तो दावा पूर्णपणे अपयशी ठरला आहे. काँग्रेसच्या काळातील स्थितीच सध्या असून, गगनाला भिडलेल्या महागाईमुळे भाजप सरकारच्या काळातही गरिबांची वाईट अवस्था होत आहे.’
Recover your password.
A password will be e-mailed to you.