
Tej Police Times
‘विकासावर लक्ष केंद्रीत करत असल्याचा दावा भाजप करतो. मात्र, ज्यांच्याकडे खरोखर विकास झालेला आहे, ते लोक भाजपचा अजेंडा अजिबात स्वीकारणार नाहीत,’ अशी टीकाही थरूर यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत केली.
‘हिंदी, हिंदुत्व, हिंदुस्थान यांच्या वर्चस्वाची भूमिका ही आपल्या बहुविधतेसाठी घातक आहे. देशाच्या संस्कृतीच्या ‘डीएनए’मध्ये धर्मनिरपेक्षता असून, ती इतक्या सहजासहजी नाहीशी होणार नाही. धर्मनिरपेक्षतेसमोर याआधी निर्माण झालेल्या आव्हानांवर राष्ट्रीय एकात्मतेने नेहमीच विजय मिळवला आहे. मात्र, ही लोकसभा निवडणूक भारतासाठी सुरू असलेल्या लढाईतील महत्त्वाचा टप्पा आहे,’ असे थरूर म्हणाले.
जागा घ्यायची तर नाशिकमधून भुजबळांना उमेदवारी द्या, भाजपचं अजितदादांना सांगणं
‘पात्र नसतानाही पंतप्रधान मोदींनी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली. यामुळे भाजपचे धर्माचे राजकारण खूप पुढे गेले. मात्र, माझ्या घरातील पूजाघरात ज्या रामाचे चित्र असते, त्या रामाचा आजीवन भक्त या नात्याने मी माझा राम भाजपला का सोपवायचा हे विचारण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. प्रभू श्रीरामाचा कॉपीराइट भाजपला कोणी दिला,’ असा सवालही थरूर यांनी केला.
देशभर एक राज्यघटना का नव्हती? कन्हानच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसला सवाल
‘२०१९मध्ये भाजपने सगळीकडे कब्जा केल्याने ते दक्षिणेतही हातपाय पसरवू शकतील, असे त्यांना वाटते. मात्र, सर्वत्र लागू असलेल्या राष्ट्रीय योजना सोडल्या, तर भाजपने दहा वर्षांत केरळमध्ये विशेष काहीही केलेले नाही. भाजपने केरळला तीन आश्वासने दिली आणि सर्व मोडली. त्यांनी केरळला ‘एम्स’चे आश्वासन दिले; मात्र एकही ‘एम्स’ येथे आलेले नाही. त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाबाबतचे आश्वासन मला दिले. मात्र, ते त्यांनी गुजरातमध्ये ते स्थापन केले,’ असे थरूर म्हणाले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.