
Tej Police Times

– यंदाच्या लोकसभेमध्ये काँग्रेस कोठेही दिसली नाही. एक महत्त्वाचे राज्य असूनही काँग्रेसचे स्टार प्रचारक येथे फिरकले नाहीत. काँग्रेसकडून देण्यात आलेली तिकीटेही काही जणांनी नाकारली. भारतीय जनता पक्षाकडे ठोस मुद्दे होते. त्या आधारे आम्ही संपूर्ण प्रचार प्रक्रिया राबवली. मात्र, प्रचार आघाडीवरही काँग्रेस मागे असल्याचे चित्र होते. प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत तेच दिसले.
– भारतीय जनता पक्षाने दोन्ही टप्प्यामध्ये अतिशय विचारपूर्वक प्रचार यंत्रणा राबविली आहे. बाडमेर लोकसभा मतदारसंघात रवींद्रसिंह भाटी याने युवकांना आकर्षित केले आहे आणि युवकांमध्येही त्याची चर्चा आहे, हे मान्य आहेच. मात्र, भाटीकडे कोणतेही ठोस मुद्दे आहेत, असे वाटत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने आधीच मांडलेले विकासाचे मुद्देच तो मांडत आहे. त्याच्या रॅली आणि सभांना होणारी गर्दी मतांमध्ये परावर्तित होईल, असे वाटत नाही. आमच्यासाठी अडचणीच्या जागांवरही भाजपच विजयी होईल.
– नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या मागे आम्ही आहोत. यंदाच्या लोकसभेसाठी राष्ट्रीय मुद्दे प्रचारामध्ये आणले गेले; याशिवाय इथल्या अनेक मतदारसंघात पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर आहे. ‘ईआरसीपी’ (इस्टर्न कॅनाल राजस्थान प्रोजेक्ट) ही जलयोजना तातडीने लागू करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि हा मुद्दा प्रचारातही आणला. याशिवाय हरियाणातून काही पाणी घेण्याबाबतही कार्यवाही सुरू झाली. गेहलोतांच्या सरकारच्या काळात पाच वर्षांत शासकीय सेवांसाठी कोणतीही परीक्षा झाली नाही. त्यामुळे युवकांमध्ये असंतोष होता. या परीक्षेत पेपरफुटी होऊन भ्रष्टाचार उघड झाला होता. आता त्यांच्यावर योग्य कारवाई केली जात असून, तरुणांच्या रोजगाराचा मुद्दाही प्रचारामध्ये आम्ही मांडला. यंदा दोन्ही टप्प्यांत भाजप विजयी होईल, यात शंका नाही.
Recover your password.
A password will be e-mailed to you.