तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

Lok Sabha Elections 2024: दुसऱ्या टप्प्यात देशात बंपर मतदान; महाराष्ट्राने पुन्हा लाज घालवली, फक्त इतके टक्के मतदान

0 54

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४च्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज २६ एप्रिल रोजी मतदान पार पडले. या टप्प्यात देशातील १३ राज्यातील ८८ लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. ज्यात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि केरळ आदी राज्यांचा समावेश होता. त्रिपूरातील एका जागेवर सर्वाधिक ६६.९७ टक्के इतके मतदान झाले. तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी ८ जागेवर अनुक्रमे ५३.१७ आणि ५३.७१ टक्के इतके कमी मतदान झाले.

कोणत्या राज्यात किती जागांवर झाले मतदान

उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र- प्रत्येकी ८
बिहार- ५
केरळ- सर्व जागा २०
कर्नाटक- १४
राजस्थान- १३
मध्य प्रदेश- ६
आसाम- ०५
पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड- प्रत्येकी ३
मणिपूर, त्रिपूरा आणि जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी एक
तुरुंगात असलेल्या अरविंद केजरीवाल यांना मतदान करता येईल का? काय सांगतो कायदा, जाणून घ्या नियम

किती टक्के मतदान झाले?

त्रिपूरा- ७७.९७ टक्के (१ जागा)
मणिपूर- ७७.१८ टक्के (१ जागा)
छत्तीसगड-७२.५१ टक्के (३ जागा)
पश्चिम बंगाल- ७१.८४ टक्के (३ जागा)
आसाम-७०.६८ टक्के (५ जागा)
जम्मू काश्मीर- ६७.२२ टक्के (१ जागा)
केरळ- ६५.०४ टक्के (२० जागा)
कर्नाटक- ६४.५७ टक्के (१४ जागा)
राजस्थान- ६०.०६ टक्के (१३ जागा)
मध्य प्रदेश-५५.३२ टक्के (६ जागा)
बिहार- ५४.१७ टक्के (५ जागा)
महाराष्ट्र- ५३.७१ टक्के (८ जागा)
उत्तर प्रदेश- ५३.१७ टक्के (८ जागा)

मोदींची प्रतिक्रिया

दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवरून एक पोस्ट केली. ज्यात ते म्हणतात, दुसरा टप्पा खुप छान झाला. संपूर्ण भारतातील लोकांचे आभार ज्यांनी आज मतदान केले. एनडीएला मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे विरोधक अजून निराश होत आहेत. मतदारांना सुशासन हवे आहे. युवा आणि महिला मतदारांनी एनडीएला मोठा पाठिंबा दिला आहे.

महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात किती टक्के मतदान झाले?

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.५१ टक्के मतदान झाले.

गावानं मतदानावर बहिष्कार टाकताच जिल्हाधिकाऱ्यांना जाग, मतदानाची वेळ रात्री १० पर्यंत वाढवली

मतदारसंघनिहाय टक्केवारी
वर्धा: ५६.६६ टक्के
अकोला: ५२.४९ टक्के
अमरावती: ५४.५० टक्के
बुलढाणा: ५२.२४ टक्के
हिंगोली: ५२.०३ टक्के
नांदेड: ५२.४७ टक्के
परभणी: ५३.७९ टक्के
यवतमाळ – वाशिम: ५४.०४ टक्के

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.