Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर छगन भुजबळांनी दिली पहिली प्रतिक्रिया; ज्यांना निवडणुका लढवायच्या असतात…

7

नाशिक (शुभम बोडके पाटील): नाशिक लोकसभा मतदारसंघातून स्वामी शांतिगिरी महाराज यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हजारो जय बाबाजी भक्त परिवाराच्या उपस्थितीमध्ये आज (सोमवारी) स्वामी शांतिगिरी महाराजांनी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केला. शांतिगिरी महाराज यांनी आपल्या उमेदवारी अर्ज शिंदे यांच्या शिवसेनेचा नाव टाकून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघात स्वामी शांतिगिरी महाराज हेच महायुतीचे उमेदवार असणार का? अशा चर्चा सुरू झाल्या स्वामी शांतिगिरी महाराजांच्या उमेदवारी अर्ज शिंदे यांचे शिवसेनेचा नाव असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.त्या संदर्भात शांतिगिरी महाराज यांनी अधिकृत माहिती देखील दिली.मात्र या संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नाशिक लोकसभा मतदार संघातून स्वामी शांतिगिरी महाराजांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ म्हणाले की,”नाशिकच्या उमेदवारीबद्दल माझ्याकडे कोणतीही माहिती नाही. मी तर नाशिकमध्येच आहे. त्यामुळे मुंबईत काय ठरलं, याबाबतची माहिती माझ्याकडे नाही. त्यांच्या शिष्टमंडळाने माझी भेट घेतली होती. मात्र ज्यांना निवडणुका लढवायच्या असतात, ते सर्वांनाच भेटत असतात.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघे बसून नाशिकमधील महायुतीचा उमेदवार ठरवतील. ते ज्या उमेदवाराचं नाव ठरवतील, त्या उमेदवाराचं काम आम्हा सर्वांना करायचं आहे. तोपर्यंत सर्वजण उमेदवारीसाठी प्रयत्न करतच राहणार,” अशा शब्दांत भुजबळ यांनी आपली भूमिका जाहीर केली. त्यामुळे आता वरिष्ठांच्या स्तरावर नेमकी नाशिक संदर्भात काय चर्चा सुरू आहे अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली असल्याने आता महायुतीत नेमकं काय सुरू आहेत, असे प्रश्न आता महायुतीच्या कार्यकर्त्यांसमोर उपस्थित होऊ लागले आहे. मंत्री छगन भुजबळांची देखील काल रात्री उशिरा बंदराड स्वामी शांतिगिरी महाराजांच्या शिष्टमंडळांना बैठक घेतली आणि आज स्वामी शांतिगिरी महाराजांनी शिंदे यांच्या शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असल्यामुळे आता नव्या चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे.

आधीच नाशिकचा तिढा सुटेना, शांतिगिरी महाराज अर्ज भरण्याआधी म्हणाले, मी लढणार आणि जिंकणार


मंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल नाशिकमधील राजकीय वातावरणात आता उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. स्वामी शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगत ऐनवेळी उमेदवारी अर्जात शिंदे यांच्या शिवसेनेचे नाव टाकून आपला उमेदवारी अर्ज हा शिंदे यांच्या शिवसेनेकडून असल्याचं त्यांनी स्वतः स्पष्ट केलं आहे. मात्र शिवसेनेकडून अद्याप एबी फॉर्म त्यांना मिळाला नसल्यामुळे नेमकी ही राजकीय खेळी तर नाही ना? असे देखील चर्चा आता सुरू झाल्याचा पाहायला मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसात माहितीचा उमेदवार नेमका कोण असणार की स्वामी शांतिगिरी महाराज यांना अधिकृत एबी फॉर्म दिला जाणार हे बघणं देखील आता महत्त्वाचे असणार आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.