Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
ज्यांची स्वप्ने पूर्ण झालेली नसतात, ते भटकते आत्मे दुसऱ्यांची स्वप्नेही पूर्ण होऊ देत नाही
ज्यांची स्वप्ने पूर्ण झालेली नसतात, ते भटकते आत्मे दुसऱ्यांची स्वप्नेही पूर्ण होऊ देत नाही, त्यांच्यामध्ये खोडा घालण्याचे काम करतात. आजपासून ४५ वर्षांपूर्वी आपल्या राजकीय महत्त्वकांक्षेपोटी इथल्या एका बड्या नेत्याने (शरद पवार) अस्थिरतेच्या खेळाला सुरूवात केली. तेव्हापासून महाराष्ट्र अस्थिरतेच्या सावटाखाली आहे. त्यामुळे अनेक मुख्यमंत्र्यांना त्यांचा ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. केवळ विरोधकच नव्हे तर आपल्या पक्षात आणि कुटुंबालाही अस्थिर करण्याचे प्रयत्न आत्मा करत असतो, असा घणाघाती हल्ला मोदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता चढवला.
पवार कायम अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न करतात
“शिवसेना भारतीय जनता पक्षाचे १९९५ साली राज्यात सरकार आले. परंतु काही दिवसांतच ते सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न या आत्म्याने सुरू केले. अगदी आत्ताही २०१९ साली राज्यातील जनतेच्या जनादेशाविरोधात जाऊन त्यांनी जनतेचा अपमान केला. सध्या केवळ महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करून हे थांबत नाहीत देशात कशी अस्थिरता निर्माण होईल, याचा प्रयत्न ते करतात”, अशी टीकाही मोदी यांनी केली.