Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Houses Flooded In Solapur: उत्तर सोलापूर तालुक्याला पावसाचा मोठा तडाखा; घरे पाण्यात, तर शेतीचे प्रचंड नुकसान
हायलाइट्स:
- उत्तर सोलापूरला पावसाचा मोठा तडाखा.
- कवठाळी तसेच कळमण या गावांमध्ये पावसामुळे शेती आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान.
- मुसळधार पावसामुळे शेतीचेही झाले मोठे नुकसान.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पाऊस पडत आहे. मात्र शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे उत्तर सोलापूर तालुक्याला जबरदस्त तडाखा बसला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठाळी तसेच कळमण या गावांमध्ये पावसामुळे शेती आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच याच तालुक्यातील रानमसले – खुनेश्वर, रानमसले – पडसाळी, रानमसले – वांगी येथील ओढे दुथडी भरून वाहत असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. (north solapur taluka was hit by rains houses were flooded and huge damage was done to agriculture)
कांदा पिकाचे मोठे नुकसान
रानमसले शिवारामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली होती. परंतु शनिवारी रात्रभर झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कांद्याच्या पिकामध्ये पाणी साचून सातत्याने ओल राहिल्यामुळे कांद्याच्या मुळ्या सडू लागल्या असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
फोटो: दयानंद कुंभार
क्लिक करा आणि वाचा- अजित पवारांनी ऐकले नाही तर त्यांना सांगावे लागेल; राऊत यांचा राष्ट्रवादीला सूचक इशारा
अनेक घरे पाण्याखाली
रानमसले गावातील गावतळे तुडुंब भरून वाहत आहे. तसेच गावाच्यालगत असलेल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे येथील नागरिकांनी संपूर्ण रात्र जागून काढली आहे .अनेक घरे पाण्यामध्ये असून घरातील संसारोपयोगी साहित्य तसेच धान्य यांची प्रचंड नासाडी झाली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांदा, सोयाबीन, मका ,उडीद तसेच मूग हे पिक घेतले होते. परंतु या खरीप पिकांना सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. कांद्यासह भाजीपाला, उडीद, मका ,सोयाबीन तसेच मूग सडून जात आहे. खरीप पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
फोटो: दयानंद कुंभार
क्लिक करा आणि वाचा- राज्य सरकारचा मोठा निर्णय; येत्या ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व मंदिरे उघडणार
बळीराज्याच्या चिंतेत वाढ
उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले परिसरांमध्ये ओढे, नाले, आणि विहिरी तुडुंब भरून वाहत असून शिवारात सर्वत्र पाणीच पाणी झाल्यामुळे बळीराजाची झोप उडाली आहे. या तालुक्यातील गावडीदारफळ ,वांगी, रानमसले ,वडाळा, कळमण, पडसाळी, नान्नज यासह शेजारील मोरवंची व खुनेश्वर या भागालासुद्धा पावसाचा मोठा फटका बसल्यामुळे बळीराजाच्या चिंतेत आणखीनच वाढ झाली आहे. शेती पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे खरिपाचे प्रचंड नुकसान होऊन शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे.महसूल विभागाने तातडीने पीक आणि घरांचे झालेले नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी केली आहे.
क्लिक करा आणि वाचा- मंदिरे, धार्मिक स्थळे ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार; पाहा, संपूर्ण नवी नियमावली!
फोटो: दयानंद कुंभार