तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

मैतेई-कुकी एकतेला कुटुंबांतच तडे; हिंसाचार वर्षपूर्तीनंतरही मणिपूरमध्ये सामाजिक अशांतता कायम

0 46

वृत्तसंस्था, इम्फाळ/चुराचंदपूर : वांशिक संघर्षाचे चटके किती दाहक असू शकतात, याचा प्रत्यय मणिपूरमधील रहिवाशी घेत आहेत. गेले वर्षभर धुमसत असलेल्या या राज्यात हिंसाचार, जाळपोळीने सामान्य नागरिकांचे जीवन झाकोळले आहे. कुकी आणि मैतेई समाजातील संघर्षाची धग बसल्यामुळे गेल्या वर्षभरापासून अनेक कुटुंबे एकमेकांपासून दुरावली आहेत.

गेल्या वर्षी मे महिन्यात मणिपूरमध्ये वांशिक हिंसाचाराच्या उद्रेकानंतर अनेक मैतेई-कुकी जोडप्यांना वेगळे राहावे लागले. आसाम किंवा मिझोरामला जाऊन महिन्यातून एकदाच कुटुंबाला भेटणे, मुलांना पाहता न येणे आणि भविष्यात नाते तुटण्याची भीती त्यांना पोखरून टाकत आहे. वांशिक संघर्षामुळे प्रभावित झालेल्या राज्यात इम्फाळ भागात बहुसंख्य नागरिक मैतेई समाजाचे आहेत, तर कुकी समुदायाचे नागरिक प्रामुख्याने डोंगराळ भागात राहतात. या दोन समाजांत गेल्या वर्षभरापासून तेढ असून त्याचे चटके आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना बसले. या जोडप्यांचा संघर्ष करुण आहे.

कुकी समाजातील इरेन हाओकीप विवाहानंतर इम्फाळमध्ये राहू लागल्या. ४२ वर्षीय हाओकीप यांना गेल्या वर्षी कुकीबहुल चुराचंदपूरमध्ये त्याच्या पालकांकडे परतावे लागले. त्यांचा पती, एक पाच वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षांची मुलगी इम्फाळमध्ये राहत आहेत. ‘माझे पती बांधकाम कामगार म्हणून आहेत. विष्णूपूरमध्ये माझ्या शेजारच्या घराच्या बांधकामादरम्यान आमची भेट झाली. आम्ही प्रेमात पडलो. २०१८मध्ये आम्ही लग्न केले. आम्हाला दोन मुले आहेत. पूर्वी येथे दोन्ही समाजाचे लोक राहत होते. आता तो ‘बफर झोन’ म्हणून ओळखला जातोय’, असे हाओकीप यांनी सांगितले. हाओकीप दर महिन्याला शेजारच्या मिझोराम राज्यात पती आणि मुलांना भेटायला जातात. यासाठी त्यांना १५ तासांचा प्रवास करावा लागतो. ‘पती मुलांनाही तिथे घेऊन येतो. इतर अनेक जोडपीही हेच करत आहेत. आम्ही महिन्यातून एकदा भेटतो आणि आपापल्या घरी परततो. माझ्या मुलांना माझी आठवण येते. पण ते जगणे आणि आईचे प्रेम यापैकी एक निवडावे लागत आहे’, अशी वेदना त्यांनी मांडली.

राजू पाटील उभा आहे असं समजूनच श्रीकांत शिंदेंचा प्रचार करा; मनसैनिकांना आदेश

सौहार्दाच्या जागी विखार

मणिपूरमध्ये पूर्वी मैतेई-कुकी विवाह होत असत. त्याबाबत आजवर कधीही सामाजिक चिंता नव्हती. दोन्ही समाजाचे लोक एकमेकांत मिसळत असत. मात्र, गेल्या वर्षी मे महिन्यापासून हे चित्र बदलले. सौहार्दाची जागा विखाराने घेतली. या हिंसाचारात आतापर्यंत २०० जणांचा मृत्यू झाला असून, शेकडो जखमी झाले आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.