Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Lok Sabha 2024: प्रियांका गांधी खासदार होणार! रायबरेलीतून राहुल गांधींच्या उमेदवारीने समोर आला काँग्रेसचा प्लॅन बी

11

रायबरेली: लोकसभा निवडणूक २०२४साठी अखेर उत्तर प्रदेशमधील बहुचर्चीत अमेठी आणि रायबरेली मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवार जाहीर केले. २०१९च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी २०२४ मध्ये पुन्हा एकदा केरळमधील वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे ते अमेठीतून निवडणूक लढणार नाही हे स्पष्ट झाले. यात सोनिया गांधी यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतल्याने गांधी कुटुंबियांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रायबरेलीतून प्रियांका गांधी निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. पण शुक्रवारी रायबरेलीतून राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काही मिनिटातच पक्षातील नेते जयराम रमेश यांनी एक ट्विट केले ज्यावर आता चर्चा सुरू झाली आहे. वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी निवडूण येणार याची खात्री असताना पुन्हा रायबरेली सारख्या आणखी एका सुरक्षित मतदारसंघातून त्यांनी अर्ज का दाखल केला असा सवाल अनेकांना पडला आहे. पण यामागे निश्चित अशी एक रणनिती असून ज्यामुळे प्रियांका गांधी या १८व्या लोकसभेत खासदार म्हणून दिसणार आहे. अर्थात त्यासाठी थोडी वाट पहावी लागले, असे रमेश यांनी म्हटले आहे.
Baramati Lok Sabha: सहनशीलतेचा अंत पाहू नका, पुन्हा बोलला तर…; सुप्रिया सुळे यांचा अजित पवारांना इशारा

रायबरेली आणि अमेठीतून उमेदवार जाहीर करण्यास काँग्रेसने बराच वेळ घेतला. याचे कारण उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षा सोबत झालेली आघाडी होय. यानुसार ८० पैकी १६ जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. यात सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी एक अट ठेवली होती. ज्यानुसार गांधी-वाड्रा कुटुंबातील एका व्यक्तीने उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढवली पाहिजे अशी अट होती. ज्यामुळे राहुल गांधी यांना अखेरच्या क्षणी उमेदवारी देण्यात आली.


अमेठीत झालेल्या सर्व्हेनुसार येथे राहुल गांधींच्या विजयाची शक्यता ५० टक्के इतकी होती. तर रायबरेली हा अधिक सुरक्षित मतदारसंघ होता. हा मतदारसंघ सुरक्षित आहे तर मग प्रियांका गांधी यांना का उमेदवारी दिली नाही असा सवाल अनेक जण विचारत आहेत.यावर उत्तर देताना जयराम रमेश म्हणाले, प्रियांका गांधी देशभरात प्रचार करत आहे. नरेंद्र मोदींच्या प्रत्येक खोट्या प्रचाराला त्या उत्तर देत आहेत. त्यामुळे जर त्यांना रायबरेलीतून उमेदवारी दिली तर एका मतदारसंघात त्या मर्यादित राहतील. त्यामुळेच नंतर एखाद्या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून त्यांना संसदेत जाता येईल.

जयराम रमेश यांच्या म्हणण्याचा अर्थ काढला तर, राहुल गांधी दोन्ही मतदारसंघातून विजयी होतील आणि नंतर वायनाडची जागा सोडतील. तेथे होणाऱ्या पोटनिवडणुकीत प्रियांका यांना निवडणूक लढवता येईल.
भाषण सुरू असताना चिठ्ठी आली; अजित पवार म्हणाले, …आणि ठोकाठोकी करण्याचा कार्यक्रम यांनी घेतलाय
रायबरेली हा वारसा नव्हे, जबाबदारी!

‘बराच विचारविनिमय केल्यानंतर, रणनीतीचा एक भाग म्हणून राहुल गांधी यांना रायबरेलीमधून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे आणि हा मतदारसंघ केवळ वारसाच नव्हे, तर जबाबदारीही आहे,’ असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले. ही दीर्घ निवडणूक प्रक्रिया असून, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत, असेही ते म्हणाले.

रमेश म्हणाले, ‘राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्यांवर अनेकांची मते भिन्न आहेत, पण ते राजकारण आणि बुद्धिबळातील अनुभवी खेळाडू आहेत आणि विचारपूर्वक आपली वाटचाल करत आहेत. मोठ्या रणनीतीचा भाग म्हणून पक्ष नेतृत्वाने बराच विचारविनिमय केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे.’

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.