
Tej Police Times
राहुल गांधी, लालू प्रसाद नाव म्हणून निवडणुकीपासून कसं रोखणार? सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली
राजकीयदृष्ट्या तीन राजधान्यांपैकी एक राजधानी करण्याची घोषणा मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी केली होती. हिंदुस्थान पेट्रोलियमची सर्वांत मोठी रिफायनरी येथे आहे. शहरामध्ये पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. लगतच्या मतदारसंघांचा लोकसभा मतदारसंघात समावेश आहे.
यंदा लोकसभेच्या रिंगणात ३३ उमेदवार आहेत. २०१९ मध्ये वायएसआर काँग्रेसचे एमव्हीव्ही सत्यनारायण विजयी झाले होते. यंदा त्यांच्या जागी राज्यातील रेड्डी मंत्रिमंडळातील शिक्षणमंत्री बी. सत्यनारायण यांची पत्नी बी. झान्सी लक्ष्मी यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी यापूर्वी विजयानगरम येथून लोकसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. टीडीपीने श्रीभारत मुथूकूमिल्ली या तरुण उमेदवारास मैदानात उतरवले आहे.
श्रीभारत माजी खासदार (कै.) एमव्हीव्हीएस मूर्ती यांचे नातू आहेत. २०१९ मध्ये त्यांचा केवळ ४,४४१ मतांनी पराभव झाला होता. काँग्रेसने पुसूलू सत्यरेड्डी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तीनही उमेदवारांकडून सिंघमनगरीत जोरदार प्रचार सुरू आहे. उमेदवारी अर्ज बाद होऊ नये यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांनी पुरेपूर काळजी घेतली होती. देशातील काही मतदारसंघांमधील अनुभव पाहता प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी तीन ते चार अर्ज दाखल केल्याचे बी. लक्ष्मी यांच्या कन्या बी. अंशू यांनी सांगितले.
विशाखापट्टणम निवृत्तांचे शहर समजले जात होते. आता ही ओळख मिटत आहे. औद्योगिक विकासाचा वेग मागील काही वर्षांपासून मंदावला असल्याचा आरोप निवडणुकीत होत आहे. राज्याची एक राजधानी करण्याचा घेतलेला निर्णय अजून अंमलबजावणीपर्यंत पोचलेला नाही. याबाबत नाराजी दिसून आली. एक व्यावसायिक एम. साईरेड्डी म्हणाले, ‘शहरात अनेक विकासकामांना वेग मिळाला आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये विकासकामाविषयी फारशी नाराजी नाही. मात्र पुढे शहराचे वैभव कायम राहावे, यासाठी कोण काय ‘व्हिजन’ सादर करणार याकडे लोकांचे लक्ष आहे.’
Recover your password.
A password will be e-mailed to you.