तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

एडीआर रिपोर्टनुसार, लोकसभेच्या चौथ्या टप्प्यांतील ३६० उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल

0 40

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यांतील १७१० पैकी ३६० उमेदवारांवर फौजदारी गुन्हे व त्यातील ५ उमेदवारांवर बलात्काराचे गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे. या टप्प्यात भाजपच्या सर्वाधिक, म्हणजे ४० उमेदवारांवर गुन्हे आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांत तेलंगणातील ८५ , महाराष्ट्रातील ५३ व उत्तर प्रदेशातील ३० उमेदवार आहेत.या टप्प्यात देशातील लोकसभेच्या ९६ जागांवर मतदान १३ मे रोजी होणार आहे. १,५४० पुरुष आणि १७० महिला उमेदवार रिंगणात आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर) या निवडणूक सुधारणांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे ही आकडेवारी समोर आणली आहे. सात उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे अस्पष्ट असल्याने त्यांचे विश्लेषण करण्यात आलेले नाही. चौथ्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील १३, महाराष्ट्रात ११, प. बंगाल आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी ८, ओडिशा आणि झारखंडमधील ४-४, तेलंगणच्या सर्व १७ आणि आंध्र प्रदेशातील सर्व २५ लोकसभा जागांसाठी मतदान होणार आहे.

खासगी शाळांसाठीची अधिसूचना स्थगित; २५ टक्के प्रवेश बंधनात सूट नाही, स्थगितीमागचे कारण काय?

या टप्प्यात एआयएमआयएमच्या तीनही उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. भाजपचे ७० पैकी ४०, शिवसेनेचे तीनपैकी दोन, भारत राष्ट्र समितीचे १७ पैकी १०, काँग्रेसचे ६१ पैकी ३५, तेलुगू देसमचे १७ पैकी ९, शिवसेना (उबाठा), राजद व बिजू जनता दलाचे प्रत्येकी ४ पैकी २, वायएसआरएसपीच्या २५ पैकी १२, तृणमूल काँग्रेसच्या ९ पैकी ३ तर समाजवादी पक्षाच्या १९ पैकी ७ उमेदवारांनी आपल्यावर गुन्हे दाखल असल्याचे जाहीर केले. यातील ११ उमेदवारांवर खुनाचे तर ३० उमेदवारांवर खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत.५० जणांवर महिला अत्याचाराचे गुन्हे आहेत. ५ उमेदवारांवर बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत.

कोट्यधीश बहुसंख्य

निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, तब्बल ४७६ उमेदवार कोट्यधीश आहेत. भाजपने ७० पैकी सर्वाधिक ६५ कोट्यधीश उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेसचे ५६ जण कोट्यधीश आहेत. शिवसेना उबाठा पक्षासह संयुक्त जनता दल, राजद आणि तेलुगू देसमचे सर्व उमेदवार कोट्यधीश आहेत. तेलुगू देसमचे चंद्रशेखर पेमसानी, भाजपचे कोंडा विश्वेश्वर रेड्डी व तेलगू देसमचेच प्रभाकर रेड्डी वेमिरेड्डी हे सर्वांत श्रीमंत उमेदवार आहेत.

२४ उमेदवारांकडे शून्य मालमत्ता

या टप्प्यातील २४ उमेदवारांनी शून्य मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे. मावळमधील भीमसेनेचे उमेदवार संतोष उबाळे यांनी आपल्याकडे फक्त ८३ रुपयेच आहेत, असे जाहीर केले आहे तर शिरूरमधील अपक्ष विकास भोर यांनी आपल्याकडे फक्त ९० रुपये असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.