Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Lok Sabha 2024: लोकसभा निवडणुकीत पावभाजी करणार कमाल? उमेदवार म्हणाला, १२ लाखाच्या लीडने विजयी होणार

11

नवी दिल्ली: देशात लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. पहिल्या ३ टप्प्यातील मतदान झाले असून यात अनेक उमेदवारांबद्दलचा तपशील समोर आला आहे. पुढील टप्प्यातील उमेदवारांच्या संपत्तीसह अन्य काही बाबींची माहिती समोर येत आहेत. तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून एका सलून चालकाने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या उमेदवाराने चायकलवर येत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आता गुरुग्राम लोकसभा मतदारसंघातील एका उमेदवाराची चर्चा संपूर्ण देशात होत आहे.कुशेश्वर भगत यांनी गुरुग्राम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भगत यांची शहरात प्रसिद्ध अशी पावभाजीची गाडी आहे. भगत चर्चेत येण्याचे हे एकमेव कारण नाही. तर त्यांनी याआधी ३ वेळा लोकसभेची निवडणूक लढवली आहे आणि दोन वेळा विधानसभेची निवडणूकीत नशीब आजमवले. अर्थात प्रत्येक वेळी त्यांच्या हाती पराभव आला.

यावेळी मात्र भगत यांनी मोठा दावा केला आहे. त्यांची पावभाजी इतकी लोकप्रिय आहे की, यावेळी १२ लाख मतांनी विजय होईल असे भगत यांनी म्हटले आहे. भगत यांच्या पावभाजीची गाडी गुरुग्रामच्या सिव्हिल लाइन येथे आहे.
बावनकुळेंचे अजित पवारांना उत्तर; प्रचारात विरोधकांबद्दल असे बोलावेच लागते त्यात काही चूक नाही!

गुरुग्राम मतदारसंघातून यावेळी एकूण २६ उमेदवार रिंगणात आहेत. ज्यात भगत यांचा देखील समावेश आहे. भगत यांची उमेदवारी चर्चेत येण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्यांनी फक्त लोकसभा आणि विधानसभा नाही तर दोन वेळा राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली आहे. गुरुग्रामच्या सेक्टर १५ मध्ये १९९६पासून त्यांची पावभाजीची गाडी आहे. भगत यांच्या मते यावेळी येथील मतदारांना बदल हवा आहे.

कुशेश्वर भगत यांनी सांगितले की, या लोकसभा मतदारसंघात ९ विधानसभेचे मतदारसंघ येतात. ज्यात ९०० समस्या आहेत. त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही. गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या नेत्यांबद्दल लोकांना आता काही वाटत नाही. लोकांना बदल हवा आहे.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना ७ हजार ९०० मते मिळाली होती. राष्ट्रपती निवडणुकीत पहिल्यांदा ७ लोकप्रतिनिधींनी तर दुसऱ्यांदा ३६ लोकप्रतिनिधींनी त्यांच्या अर्जावर स्वाक्षरी केली होती. दोन्ही वेळा अर्जावर आवश्यक लोकप्रतिनिधींचा पाठिंबा नसल्याने त्यांचा अर्ज रद्द झाला होता.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.