
Tej Police Times
उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर असून येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मदतीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. राज्यात लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून अजूनही हजारो एकर शेती पाण्याखाली आहे. या अतिवृष्टीमध्ये सोयाबीनबरोबरच कपाशीच्या पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून सरकार केव्हा मदत देईल याची तो वाट पाहत आहे. शिवाय विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही सरकारवर ताशेरे ओढत तत्काळ मदत देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीने ही मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर पुढच्याच आठवड्यात मदतीबाबत निर्णय घेण्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा- ‘अमेरिकेत गायब होत्या’; धनंजय मुंडे याची पंकजा मुंडेंवर खोचक भाषेत टीका
राज्यात झालेले नुकसान पाहता विमा कंपन्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांना विम्याची रक्कम द्यावी, अशा सूचन विमा कंपन्यांना देण्यात आल्याची माहितीही अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. यावेळी पवार यांनी विरोधंकांच्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिले आहे.
क्लिक करा आणि वाचा- यंदा नवरात्रोत्सवही साधेपणाने; महापालिकेची नियमावली जाहीर
शेतकरी संकटात असताना राष्ट्रवादीचे मंत्री संवाद यात्रेत फिरत होते. त्यांना शेतकऱ्यांचा अजिबात कळवळा नाही. त्यांना पक्ष, सत्ता महत्त्वाची आहे, अशी टीका विरोधी पक्षाचे नेते करत होते. त्यावर अजित पवार म्हणाले की, राज्यात अतिवृष्टी होत होती तेव्हा आमचे मंत्री मराठवाड्यातच होते. जराही वेळ न दवडता मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. हे पाहता विरोधकांचे आरोप बरोबर नाहीत. त्यामुळे मंत्री फिरकलेच नाहीत, असे जे विरोधक बोलत आहेत ते योग्य नाही. संबंधित मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरेच केले आहेत, असे पवार म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- मुंबईतल्या अंधशाळेतून नव्या अंध मत्स्यकुळातील प्रजातीचा शोध; संशोधकांमध्ये तेजस ठाकरेंचा समावेश
Recover your password.
A password will be e-mailed to you.