Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Marriage Solution : वय वाढतंय, लग्न जुळत नाहीये? अडथळे येताय? ज्योतिषशास्त्रानुसार करा हे उपाय, मिळेल मनासारखा जोडीदार

11

Marriage Remedies :

लग्न ही गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची आहे. लग्नानंतर आयुष्यात अनेक बदल होतात. परंतु, हल्ली वय वाढत जाते पण मनासारखा जोडीदार मिळत नाही.

लग्न जमवताना खरेतर मुला-मुलीची पत्रिका पाहिली जाते. या दरम्यान जर दोघांच्या पत्रिकेत काही दोष असतील तर ज्योतिषशास्त्रानुसार उपाय करुन त्यावर मात करता येते. तसेच लग्न जमवताना दोघांचे ही गुण १८ पेक्षा जास्त असायला हवे.
Mohini Ekadashi 2024 : भगवान विष्णूला ही ४ फुले अतिशय प्रिय; मोहिनी एकादशीला करा अर्पण, होतील अनेक मनोकामना पूर्ण
अनेकदा काही प्रेमप्रकरणात लग्न करायची इच्छा असते परंतु, काही अडचणींमुळे विवाहात अडथळे येतात. जर तुमचेही वय वाढत असेल आणि जोडीदाराच्या वैयक्तिक आयुष्यातील अडथळ्यांमुळे वैतागले असाल तर ज्योतिषशास्त्रातील हे उपाय करुन पाहा. लग्नाच्या मार्गातील अनेक अडथळे दूर होतील.

1. गौरी शंकराचा रुद्राक्ष अत्यंत प्रभावी मानला जातो. गौरी शंकर रुद्राक्ष प्रेम आणि वैवाहिक जीवनातील सुख आणि शांती यांच्याशी संबंधित आहे. जर तुमच्या आयुष्यात लग्नाविषयी वारंवार समस्या येत असतील तर गौरी शंकरला रुद्राक्ष धारण करा. हे धारण करण्यासाठी गौरी शंकर रुद्राक्ष गंगेच्या पाण्यात बुडवावा, त्यानंतर दुसऱ्या दिवशी माता गौरी आणि महादेवाचे ध्यान करुन रुद्राक्ष धारण करा.

2. वय वाढले आहे आणि लग्न जमत नसेल तर ज्योतिषशास्त्रातील हा उपाय करुन बघा. त्यासाठी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद आणि गंगाजल मिसळा. हा उपाय ४३ दिवस सतत केल्याने लग्नातील सर्व अडथळे दूर होतील. तसेच तुमच्या मनासारखा जोडीदार तुम्हाला मिळेल.
Sita Navami 2024 : लक्ष्मी प्राप्तीसाठी सीता नवमीला करा हे ५ उपाय, तिजोरीत वाढेल पैसाच पैसा!
3. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी आपल्या तळहातावर शुक्र पर्वतावर चंदनाचा तिलक लावणे. तळहातावर चंदन ४३ दिवस लावावे. यामुळे लग्नातील सर्व अडथळे दूर होतील तसेच आवडीचा जोडीदार मिळेल.

4. विवाहाच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी दर सोमवारी व्रत करावे. तसेच शंकराच्या पिंडीवर दूध, पाण्याचा अभिषेक करुन बेलपत्र व्हा. यामुळे भगवान शिव आणि देवी पार्वतीचा आशीर्वाद तुमच्यावर राहिल. त्यामुळे तुमचे लग्नही लवकर जमेल.

5. तसेच गुरुवारी भगवान विष्णूची मनोभावे पूजा केल्याने विवाहित महिलांना सुख आणि सौभाग्य प्राप्त होते. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी काही खास मंत्राचा जप केल्यास विवाहातील अडथळे दूर होतात.

टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.