तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

उत्तर भारतात उष्णतेची लाट; दिल्ली, हरयाणाचे तापमान ४५च्या पुढे जाण्याची शक्यता

0 27

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : उत्तर भारतामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून, पुढील पाच दिवस दिल्लीसह पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले जाण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाकडून या राज्यांमध्ये ‘ऑरेंज अॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे. याशिवाय, मध्य व पूर्व भारतातही शनिवारपासून (१८ मे) नव्याने उष्णतेने लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांनी विशेषत: नवजात अर्भक, ज्येष्ठ नागरिक आणि दुर्धर आजार असणाऱ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असेही या सूचनेमध्ये म्हटले आहे. पश्चिम राजस्थानच्या काही भागांमध्ये १७ ते २० मे, तर पंजाब, हरियाणा, दिल्लीमध्ये १८ ते २० मे या काळामध्ये उष्णतेची लाट तीव्र असेल. दिल्लीमध्ये शनिवारी कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाईल, असे या अंदाजात म्हटले आहे. पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, गुजरात, झारखंड, पश्चिम बंगाल व ओडिशा या राज्यांमध्ये ‘येलो अॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

केरळमध्ये पावसाचा अंदाज

तिरुअनंतपुरम : पुढील पाच दिवस केरळच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पलक्कड व मलप्पुरम जिल्ह्यामध्ये १८ मे, पठानमतिट्टा, अल्लपुळा व इडुक्की जिल्ह्यांत १९ मे रोजी, तर अन्य सात जिल्ह्यांसाठी २० मे रोजी ‘ऑरेंज अॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या काळामध्ये सहा ते २० सेंटिमीटरपर्यंत पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Nagpur Rain: वीज अंगावर पडून दोघांचा मृत्यू; काटोल तालुक्यातील कंदुरी कार्यक्रमादरम्याची घटना
तमिळनाडूत पावसाची हजेरी

चेन्नई : चेन्नई आणि परिसरातील जिल्ह्यांमध्ये गुरुवारी पावसाने हजेरी लावली. या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. राज्याच्या दक्षिण व पश्चिम भागामध्ये २० मेपर्यंत मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. चेन्नईमध्ये काही दिवसांपासून तीव्र उकाडा जाणवत होता. या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.