
Tej Police Times
आसामच्या लखीमपूर येथील ट्रॅक्टर टिळा या परिसरात ही घटना घडली आहे. देब आडनावाचे कुटुंब तेथे राहते. त्यांचा पाळीव कोंबडा अचानक विहिरीत पडला. घरातील लहान मुलाने त्याला पडताना पाहिल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी त्याने उडी घेतली. त्यानंतर तो बाहेर येऊ शकला नाही. त्याला वाचवण्यासाठी मोठ्या भावाने आत उडी घेतली. तो बाहेर येऊ शकला नाही. त्यानंतर एक स्थानिक मुलगा दोघांना वाचवण्यासाठी विहिरीत गेला. पण तोही बाहेर पडू शकला नाही. त्यानंतर लोकांनी माहिती देऊन पोलिसांना बोलावले.
आधी हातपाय बांधले, नंतर दुकानदाराचे भयंकर कृत्य, दुकानात गेलेल्या चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं?
पोलिसांकडून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास केला, त्यानंतर एसडीआरएफला माहिती देण्यात आली. यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मिळून बचावकार्य केले. त्या विहिरीतून तिन्ही लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. विहिरीतील विषारी वायुमुळे तिघांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत एसपी कचार नुमल महत्ता यांनी अधिकची माहिती दिली आहे.
त्यांनी सांगितले की, ”ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. विहिरीत एक कोंबडा पडला होता. त्याला वाचवण्यासाठी आणखी दोन माणसे विहिरीत उतरले. त्यानंतर तिघांचाही पत्ता लागला नाही. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी पोलीस प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर आमची एसडीआरएफ आणि एनडीआरएफ टीम घटनास्थळी पोहोचली आणि तिघांचेही मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. तसेच तीनही व्यक्तींचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सिलचर मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहेत.” दरम्यान, घडलेल्या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.