तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

ना प्रचारात सहभाग, ना संघटनेत रस; पाचवा टप्पा संपताच भाजपकडून बड्या नेत्याला नोटिस

0 32

नवी दिल्ली: देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. काल देशात पाचव्या टप्प्यातलं मतदान झालं. मतदानाचे आणखी दोन टप्पे शिल्लक आहेत. निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलेलं असताना भारतीय जनता पक्षानं माजी केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी दोन दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.

जयंत सिन्हा २०१४ आणि २०१९ मध्ये झारखंडच्या हझारीबाग लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यांच्या जागी यंदा पक्षानं मनीष जयस्वाल यांना संधी दिली. यानंतर सिन्हा प्रचारापासून दूर राहिले. त्यांनी संघटनेच्या कामातही फारसा रस दाखवला नाही. त्याबद्दल पक्षानं त्यांच्याकडे जाब विचारला आहे. विशेष म्हणजे जयंत सिन्हा यांनी मतदानही केलं नाही. त्यामुळे पक्षानं त्यांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. आपली बाजू मांडण्यासाठी त्यांना २ दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे.
Nashik Lok Sabha Election: शहरात घासून सामना, ग्रामीणमध्ये ‘मशाल’ जोरात; गोडसेंची मतं ‘बादली’त? नाशकात गेम फिरणार?
पक्षानं तिकीट नाकारल्यानं जयंत सिन्हा नाराज असल्याची चर्चा आहे. याच कारणामुळे ते प्रचारापासून लांब राहिले. त्यांचा हाच पवित्रा पाहून पक्षानं त्यांना कारणे दाखवा नोटिस पाठवली आहे. ‘लोकसभा निवडणूक २०२४ साठी पक्षानं हझारीबाद मतदारसंघातून मनिष जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर केली. तेव्हापासून तुम्ही ना प्रचारात दिसलात, ना संघटनात्मक कामांमध्ये रस घेतलात. लोकशाहीच्या उत्सवात तुम्ही मतदानही केलं नाही. तुमच्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला फटका बसला आहे,’ असा मजकूर सिन्हा यांना पाठवण्यात आलेल्या नोटिशीत आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी यांच्या सूचनेनंतर जयंत सिन्हा यांना नोटिस पाठवण्यात आली. धनबादचे आमदार राज सिन्हा यांनादेखील नोटिस बजावण्यात आली आहे. पक्षाच्या उमेदवाराविरोधात विधान केल्याप्रकरणी त्यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे. यासंदर्भात राज्यसभेचे खासदार आणि पक्षाचे महासचिव आदित्य साहूंनी भाजपची बाजू मांडली. पक्ष बेशिस्तपणा खपवून घेत नाही. हा विषय पक्षशिस्तीचा आहे, असं साहू म्हणाले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.