Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Buddha Purnima 2024 : बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूची का केली जाते पूजा? जाणून घ्या मंत्र आणि पूजा पद्धत
Buddha Jayanti Purnima 2024
प्रत्येक महिन्यात एकदा तरी पौर्णिमेची तिथी येते. मराठी महिन्यानुसार प्रत्येक पौर्णिमेचे विशेष असे महत्त्व देखील असते. धार्मिकेतनुसार पौर्णिमेच्या दिवशी काही विशिष्ट गोष्टी केल्याने फायदा होतो.
वैशाख महिन्यात येणारी पौर्णिमा तिथीला बुद्ध पौर्णिमा आणि पिंपळ पौर्णिमा या नावानेही ओळखले जाते. या पौर्णिमेला गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. त्यामुळे याला बुद्ध पौर्णिमा असे म्हटले जाते.
धार्मिक ग्रंथानुसार, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता असे म्हटले जाते. त्यांना भगवान विष्णूचा दहा प्रमुख अवतारांपैकी नववा अवतार मानला जातो. पौर्णिमेच्या दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि त्याच दिवशी त्यांना मोक्षही प्राप्त झाला होता. जाणून घेऊया पौर्णिमा कधी पासून सुरु होते त्याविषयी.
1. बुद्ध पौर्णिमा तिथी
हिंदू पंचांगानुसार बुद्ध पौर्णिमेची तिथी बुधवारी २२ मे ला संध्याकाळी ६.४८ मिनिटांनी सुरु होईल. आणि गुरुवारी २३ मे रोजी संध्याकाळी ७.२३ मिनिटांपर्यंत असेल. त्यामुळे २३ मे रोजी वैशाख पौर्णिमेचे व्रत केले जाणार आहे. शास्त्रानुसार प्रदोषकाळात पौर्णिमेचे व्रत करणे महत्त्वाचे आहे.
2. बुद्ध पौर्णिमा मंत्र
सूर्यास्तोत्तर-त्रिमुहूर्तका प्रदोषव्यापिनी तिथिर्नक्ते ग्रह्या । अन्यतरदिन, तदप्तौ तडेकदेशस्पर्श ”दिन्द्वे प्रदोषव्याप्तौ परा। दिनद्वे प्रदोषव्यप्त्यभावे परत्रेव
अर्थ
पौर्णिमेचा व्रत हे प्रत्येक महिन्याच्या प्रदोषव्यापिनी आणि चंद्रोदय व्यापिनी पौर्णिमेला पाळावे. प्रदोष काळात हे व्रत करण्याची परंपरा आहे. जर प्रदोष काळात पौर्णिमा आली तर त्यादिवशी उपवास केल्याने फायदा होतो. यंदा या पौर्णिमेचा व्रत २३ मे रोजी केले जाईल.
पौराणिक मान्यतेनुसार वैशाख महिन्यात भगवान विष्णूची मनोभावे पूजा केल्याने अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण होतात. तसेच जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते.
3. वैशाख पौर्णिमा पूजा पद्धत
- पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करुन भगवान विष्णूची पूजा करावी.
- यानंतर पाण्याने भरलेली घागर ब्राह्मणाला दान करा.
- संध्याकाळी सत्यनारायणाची कथा वाचावी, प्रसाद आणि पंचामृत वाटावे.
- भगवान विष्णूला नैवेद्य अर्पण करा आणि नंतर ब्राह्मणाला दान दिल्यानंतर उपवास सोडा.
टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.