तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

भाजपने तिकीट कापले, जयंत सिन्हा यांची मतदानाला दांडी, आता पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस

0 34

मंगेश वैशंपायन, नवी दिल्ली : मोदी सरकारचे माजी अर्थ राज्यमंत्री आणि झारखंडच्या हजारीबागचे विद्यमान खासदार जयंत सिन्हा यांनी यंदा मतदानालाही दांडी मारल्याने भाजपने त्यांना मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावली. भाजपचे कडवे टीकाकार असलेले माजी पक्षनेते यशवंत सिन्हा यांचे पुत्र जयंत यांचे तिकीट भाजपने रद्द केल्याने ते नाराज आहेत.

जयंत सिन्हा यांना बजावलेल्या नोटीसमध्ये भाजपचे प्रदेश सरचिटणीस आदित्य साहू यांनी म्हटले आहे की हजारीबाग मतदारसंघातून मनीष जैस्वाल यांना भाजप उमेदवार घोषित केल्यापासून तुम्ही संघटनात्मक काम आणि निवडणूक प्रचारात रस घेतलेला नाही. तुम्ही यंदा तुमचा मताधिकार वापरणेही योग्य मानले नाही. तुमच्या वागण्याने पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे.
वायनाडमध्ये आयेगा तो राहुल ही! डाव्यांच्याच निरीक्षणातील निष्कर्ष

२०१९ मध्ये सिन्हा यांनी काँग्रेसचे गोपाल साहू यांचा पराभव करून तब्बल पावणेपाच लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला होता. झारखंडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीत सोमवारी तीन जागांवर मतदान झाले. हजारीबागमध्ये सर्वाधिक ६४.३२ टक्के मतदान झाले होते. मात्र खुद्द खासदार सिन्हा यांनीच मतदानाकडे पाठ फिरविल्याने त्याची सर्वत्र चर्चा होती. खासदार सिन्हा मार्चनंतर विदेशात असल्याचेही सांगितले जाते.


भाजपच्या निवडणूक यंत्रणेने प्रत्येक लोकसभा जागेवर केलेल्या कथित सर्वेक्षणानंतर दिल्लीतील गौतम गंभीर यांच्यासह सहा खासदार, हजारीबागचे सिन्हा, मुंबईत पूनम महाजन, गोपाळ शेट्टी आदी शेकडो खासदारांची तिकीटे यंदा कापण्याचा निर्णय यंदा घेतला. सिन्हा यांना तिकीट देणार नसल्याचे भाजप नेतृत्वाने स्पष्ट केल्यावर त्यांनी यंदाच्या मार्चमध्ये निवडणूक न लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे. आगामी काळात ते भाजपला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.