तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

राहुल गांधी यांच्या अडचणी वाढल्या; रांची न्यायालयाने बजावले समन्स, ‘या’ दिवशी हजर राहण्याचे आदेश

0 35

नवी दिल्ली: खासदार आमदार न्यायालयाने अमित शाह यांच्यावर केलेल्या टिप्पणीप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. भाजप कार्यकर्ता नवीन झा यांनी रांची दिवाणी न्यायालयात याबाबत तक्रार दाखल केली होती. ११ जून रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत राहुल गांधींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या समन्सनंतर निवडणूक प्रचाराच्या वातावरणात राहुल गांधींच्या अडचणी वाढू शकतात.
‘भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त’, संबित पात्रा यांचे विधान भाजपला भोवणार, निवडणुकीत फटका बसणार?
या प्रकरणी तक्रारदार नवीन झा यांचे वकील विनोद साहू म्हणाले की, हे संपूर्ण प्रकरण २०१८ च्या काँग्रेस अधिवेशनात अमित शाह यांच्यावर केलेल्या गंभीर टिप्पणीशी संबंधित आहे. याप्रकरणी रांची भाजप नेते नवीन झा यांनी कनिष्ठ न्यायालयात तक्रार दाखल केली होती. ज्याची न्यायालयाने दखल घेतली होती. या संपूर्ण प्रकरणात साक्ष आणि खटला चालला. त्यानंतर न्यायालयाने राहुल गांधींविरोधात समन्सही बजावले होते. राहुल गांधी यांनी कनिष्ठ न्यायालयाच्या समन्सला झारखंड उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पण तिथेही हायकोर्टाने राहुल गांधींची रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली होती.

अशा परिस्थितीत उच्च न्यायालयात याचिका फेटाळल्यानंतर रांचीच्या खासदार आमदार न्यायालयाने मंगळवारी याप्रकरणी राहुल गांधींना समन्स बजावले आणि ११ जून रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत त्यांना प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. राहुल गांधींच्या वतीने चाईबासा न्यायालयाच्या निर्णयाला झारखंड उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. गेल्या सुनावणीत राहुल गांधींनी सलग तिसऱ्यांदा वेळ मागितली असता, हायकोर्टाने त्यांना १००० रुपयांचा दंड ठोठावला होता. खरे तर चाईबासा कोर्टाने राहुल गांधींविरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी केले आहे. याबाबत राहुल गांधी उच्च न्यायालयात पोहोचले असून तेथेही सुनावणी सुरू आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.