
Tej Police Times
राष्ट्रीय आपत्ती केंद्राचे कार्यवाहक संचालक लुसेट लासो माना यांनी संयुक्त राष्ट्राला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भूस्खलनामुळे २ हजारांहून अधिक लोक जिवंत गाडले गेले आणि इमारती आणि शेतांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, ज्याचा देशाच्या आर्थिक घडीवर मोठा परिणाम झाला आहे. ते म्हणाले की, भूस्खलन संथ गतीने पुढे जात असल्याने परिस्थिती अस्थिर झाली आहे, जी लोकांसाठी धोक्याची ठरू शकते. तसेच दरड कोसळल्यामुळे अनेक भागांना जोडणारे रस्तेही बंद झाले आहेत. पापुआ न्यू गिनीमध्ये सुमारे १० दशलक्ष लोक राहतात. खराब रस्ते आणि दरड कोसळल्यामुळे बचावपथकांना बाधित भागात पोहोचणे कठीण झाले आहे.
Indigo Flight: इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी, प्रवाशांमध्ये एकच गोंधळ; कोणी मारल्या उड्या तर कोणी…
सिडनी युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ सिव्हिल इंजिनीअरिंगचे सहयोगी प्राध्यापक पियरे रोगनन म्हणाले की, भूस्खलनानंतर लोकांना शोधणे खूप आव्हानात्मक असतं आणि भूस्खलनामुळे कोसळलेल्या इमारती आणि लोक अनेक मीटर खाली दबले जाऊ शकतात. बचाव अधिकाऱ्यांनी सांगितले की, भूस्खलन कशामुळे झाले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु ॲडलेड विद्यापीठातील भूगर्भशास्त्राचे प्राध्यापक ॲलन कॉलिन्स सांगतात, ‘भूस्खलन थेट भूकंपामुळे झालेले नाही. हा अतिशय पावसाळी भाग होता, त्यामुळे येथे असे घडले असावे. तर डोंगरउतार बनवणारे खडक पावसामुळे कमकुवत झाले असावेत.’
Recover your password.
A password will be e-mailed to you.