Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Cyclone Remal Update: रेमल चक्रीवादळाचे मिझोराममध्ये थैमान, भूस्खलनात १७ जणांचा बळी, अनेक जण बेपत्ता

9

मिझारोम: चक्रीवादळ रेमलमुळे मिझोरामच्या ऐझॉल जिल्ह्यात सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे दगडाची खाण कोसळली आहे. ज्यामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक बेपत्ता झाल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. अपघाताबाबत माहिती देताना आपत्ती व्यवस्थापन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, “आतापर्यंत दहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत आणि अनेक जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.तर इतर अनेक जिल्ह्यांतून पावसामुळे भूस्खलनाच्या बातम्या येत आहेत, यासह इतर ठिकाणी किमान दोन जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यांतील वाहनांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे अनेक इमारती, घरे, रस्ते आणि पूल वाहून गेले आहेत. डोंगराळ राज्याची जीवनरेखा असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ६ वर अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे मिझोरामची राजधानी आयझॉलचा देशाच्या इतर भागापासून संपर्क तुटला आहे.
Pune News : दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई; भोसरीत बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या ५ बांगलादेशी नागरिकांना अटक
जिल्हा व्यवस्थापन अधिकारी आणि इतर स्थानिक लोक अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. आपत्ती व्यवस्थापनाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. ढिगाऱ्याखाली किती लोक अडकले आहेत याची माहिती त्यांच्याकडे नाही.” पीडितांपैकी सात माकामी आहेत, तर उर्वरित राज्याबाहेरील आहेत,” अधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रकरणी मिझोरामचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी सांगितले की, सकाळी ११.१५ पर्यंत मृतांची पुष्टी झालेली संख्या १७ होती. यापैकी ११ मृतदेह ऐझॉल जिल्ह्यातील मेल्थम आणि ह्लिमेन दरम्यानच्या दगडाच्या खाणीतून भूस्खलनाच्या ठिकाणी सापडले आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी मृतदेह अडकले आहेत. भूस्खलनाच्या ठिकाणावरून आणखी दोन मृतदेह सापडले आहेत, तर तिसऱ्या जागेवरून आणखी एक मृतदेह सापडला आहे.

आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांशिवाय सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगण्यात आले आहे. त्याचवेळी रेमल वादळाने पश्चिम बंगाल आणि बांगलादेशमध्येही विध्वंस केला आहे. त्यामुळे बंगालपासून बांगलादेशपर्यंतच्या लोकांना मुसळधार पावसाचा सामना करावा लागत आहे. रेमल चक्रीवादळ ताशी ३५ किलोमीटर वेगाने बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकले. रेमल वादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.